अशोक स्तंभावरून टीका होताच केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

नव्या संसद भवनातलं राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. या अशोक स्तंभामध्ये जे सिंह दाखवण्यात आले आहेत ते अतिशय उग्र आणि हिंस्त्र स्वरूपातले दाखवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमुद्रेमध्ये बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून मागचे तीन दिवस वाद सुरू आहे. अशात आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नव्या संसद भवनातलं राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. या अशोक स्तंभामध्ये जे सिंह दाखवण्यात आले आहेत ते अतिशय उग्र आणि हिंस्त्र स्वरूपातले दाखवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमुद्रेमध्ये बदल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून मागचे तीन दिवस वाद सुरू आहे. अशात आता केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी?

सारनाथ या ठिकाणी असलेल्या अशोक स्तंभाकडे बारकाईने बघितलं तर त्यावरचे सिंहही तेवढेच क्रोधित किंवा शांत दिसतील. अशोक स्तंभाची प्रतिकृती संसदेत बसवण्यात आली आहे. ही प्रतिकृती भव्य उंचीची आहे. सारनाथमध्ये असलेला स्तंभ हा जमिनीवर आहे. तर नवा अशोक स्तंभ जमिनीपासून ३३ मीटर उंचीचा आहे. त्यामुळे हे सिंह क्रोधित, उग्र किंवा अधिक चिडलेले दिसू शकतात. मात्र एका विशिष्ट अंतरावरून याकडे पाहिलं तर सारनाथच्या अशोक स्तंभात आणि या अशोक स्तंभात काहीही फरक दिसत नाही.

नव्या अशोकस्तंभावर (Ashoka Pillar) काय आहे आक्षेप?

नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे पूर्वीच्या स्तंभावरील सिंहांपेक्षा आक्रमक आणि लढण्याच्या पवित्र्यात आहेत असं दाखवण्यात आलं आहे.

राष्ट्रीय प्रतीक बदललं गेलं आहे, मोदींच्या मनाप्रमाणे हा अशोकस्तंभ घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

हे वाचलं का?