Blog : मला कळलेली भारत जोडो यात्रा…
खरंतर वर्ण व्यवस्थेचा पगडा असलेल्या आपल्या देशात प्रत्येक गोष्ट वरून खालच्या अशा उतरणीच्या दिशेनं करण्याची पद्धत रुढ आहे; पण राहुल गांधी यांनी खालून वरच्या दिशेनं पदयात्रा करण्याचा कॉन्शियस निर्णय घेतल्याचं दिसतंय. त्याची कारणंही अनेक असावीत. सामाजिक, प्रादेशिक, भाषिक, भौगोलिक आणि अर्थात राजकीय. म्हणजेच राहुल गांधी यांनी वयाच्या ५२व्या वर्षात प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास सुरु केलाय. […]
ADVERTISEMENT

खरंतर वर्ण व्यवस्थेचा पगडा असलेल्या आपल्या देशात प्रत्येक गोष्ट वरून खालच्या अशा उतरणीच्या दिशेनं करण्याची पद्धत रुढ आहे; पण राहुल गांधी यांनी खालून वरच्या दिशेनं पदयात्रा करण्याचा कॉन्शियस निर्णय घेतल्याचं दिसतंय. त्याची कारणंही अनेक असावीत. सामाजिक, प्रादेशिक, भाषिक, भौगोलिक आणि अर्थात राजकीय. म्हणजेच राहुल गांधी यांनी वयाच्या ५२व्या वर्षात प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास सुरु केलाय.
थोडा उशीरच झालाय असं अनेकांना वाटेल. पण कधीतरी हे करणं गरजेचं होतं. त्याला प्रचंड आत्मविश्वास, धैर्य, त्याग आणि समर्पणाची तयारी लागेल. ‘भारत जोडो यात्रा‘ त्या दिशेने एक छोटंसं पाऊल म्हणावं लागेल.
कशासाठी निघालीय भारत जोडो यात्रा?
समोर बलाढ्य नरेंद्र मोदी नावाचं व्यक्तिमत्व मागच्या सात-आठ वर्षात जन माणसाच्या मनावर गारुड घालून आहे. त्यांचा चहावाला ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या खांद्यावर घर, परिवार, घराणेशाही आणि वैयक्तिक स्वार्थ असं कुठलंही बॅगेज (ओझं) नाही. काम करण्याची अफाट क्षमता आणि त्याला मुत्सद्दीपणाची जोड. यामुळे जननेता ते सक्षम शासक या कसोट्यांवर मोदी स्वतःला सिद्ध करताना दिसताहेत.