मुंबईतील कोविड संसर्गाचे व्यवस्थापन व आकडेवारी ही पूर्णपणे पारदर्शक !

मुंबई तक

कोरोना विषाणूच्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई शहरात यंत्रणेने अवलंबलेल्या पॅटर्नचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र सरकारचं यासाठी कौतुक केलं परंतू राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मात्र मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या याची बनवाबनवी थांबवा आणि जनतेची दिशाभूल करु नका असं म्हटलं होतं. फडणवीसांनी केलेल्या या आरोपांवर महापालिकेने आपली बाजू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोरोना विषाणूच्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई शहरात यंत्रणेने अवलंबलेल्या पॅटर्नचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र सरकारचं यासाठी कौतुक केलं परंतू राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मात्र मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या याची बनवाबनवी थांबवा आणि जनतेची दिशाभूल करु नका असं म्हटलं होतं. फडणवीसांनी केलेल्या या आरोपांवर महापालिकेने आपली बाजू मांडली आहे.

मुंबईतील कोविड संसर्गाचे व्यवस्थापन आणि आकडेवारी ही पूर्णपणे पारदर्शक आहे. कोविड चाचण्या आणि कोविड मृत्यूंच्या बाबतीत केली जाणारी कार्यवाही ही ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलंय. मुंबईत कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याबद्दल महापालिकेकडून आभासी चित्र उभं केले जात असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांमधून आणि समाजमाध्यमांमधून होत आहेत. हे आरोप पूर्णपणे निराधार असून महापालिका प्रशासन याचा इन्कार करत आहे. जागतिक आरोग्य संघटना, ICMR यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच मुंबई महापालिका कोविड चाचण्या व मृत्यूची नोंद करत आहे. यामुळेच शहरातली परिस्थिती नियंत्रणात असून महापालिकेच्या मुंबई पॅटर्नचं सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय केले होते आरोप??

मुंबईतील कोरोना हा प्रशासकीय उपायांमुळे नियंत्रणात आला आहे असे आभासी चित्र निर्माण केले जाते. याबाबत वारंवार अनेक बाबी मी आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र दुर्दैवाने प्रत्येकवेळी आभासी चित्र उभे करण्यासाठी अशा कठीण काळातही विविध पी आर कंपन्या आणि सेलिब्रिटी यांचा वापर केला जात आहे हे खरोखरच दुर्दैवी आहे.

हे वाचलं का?