महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त होऊ शकते का? काय आहेत नियम?

मुंबई तक

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप आला आहे. आपल्यासोबत ३३ हून अधिक आमदार आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एवढंच नाही तर मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व मानणारा शिवसैनिक आहे, मी शिवसेना पुढे घेऊन जाणार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप आला आहे. आपल्यासोबत ३३ हून अधिक आमदार आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एवढंच नाही तर मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व मानणारा शिवसैनिक आहे, मी शिवसेना पुढे घेऊन जाणार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सर्वात मोठा भूकंप आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारण विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असं सूचक ट्विट केलंय. त्यामुळे धक्का किती मोठा आहे याची कल्पना येतेच.

आता आपण जाणून घेणार आहोत की विधानसभा बरखास्त कशी करता येऊ शकते. त्यासाठीची नियमावली काय आहे? अलिकडेच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्यास सांगितलं. कार्यकाळाचे सहा महिने शिल्लक असताना विधानसभा विसर्जित करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पुनर्निवडणुकीच्या आधारे पुनर्रचना करण्यासंबंधी सांगितलं आहे. मुख्यमंत्री तसंच राज्यपाल यांची भूमिका सारखीच असल्याने हे घडलं. मात्र ही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात विस्तवही जात नाही हे वारंवार दिसून आलं आहे.

आता दोन प्रश्न निर्माण होतात ते असे…

हे वाचलं का?

    follow whatsapp