विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही-उद्धव ठाकरे

मुंबई तक

आम्ही जेव्हा विरोधात होतो त्यावेळी कधीतरी शिष्टमंडळ घेऊन आम्हीही राजभवनावर यायचो. रोज रोज येत नव्हतो असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आलं. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

आम्ही जेव्हा विरोधात होतो त्यावेळी कधीतरी शिष्टमंडळ घेऊन आम्हीही राजभवनावर यायचो. रोज रोज येत नव्हतो असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आलं. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे. आपल राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. 50 एकरात हे राजभवन आहे. इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या असाही टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकलं जातं मात्र इथे जपलेलं आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हे वाचलं का?