लॉकडाउन लावू नका सांगणाऱ्या आनंद महिंद्रांना मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई तक

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधला. लॉकडाउन लावण्याची माझी इच्छा नाही, परंतू वाढती रुग्णसंख्या पाहता मला दुसरा पर्याय मिळाला नाही तर पूर्णपणे लॉकडाउन लावलं जाईल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. राज्यात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध लादले जात आहेत. पुण्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
google news

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधला. लॉकडाउन लावण्याची माझी इच्छा नाही, परंतू वाढती रुग्णसंख्या पाहता मला दुसरा पर्याय मिळाला नाही तर पूर्णपणे लॉकडाउन लावलं जाईल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. राज्यात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध लादले जात आहेत. पुण्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू लॉकडाउन लावल्यास अर्थव्यवस्थेला आणि सामान्य माणसाला होणारं नुकसान लक्षात घेता अनेक जणांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला होता.

मास्क न लावण्यावरुन मुख्यमंत्री संतापले, नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं!

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लॉकडाउन लावू नका अशी विनंती केली होती. “लॉकडाउन लावलं तर छोटे-मोठे उद्योगधंदे, गरीब लोकं आणि कामगार यांना फटका बसेल. सर्वात आधी जे लॉकडाउन लावण्यात आलं ते आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी करण्यात आलं, आपण त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं.”

शुक्रवारी जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आनंद महिंद्रांच्या या प्रस्तावावर आपली प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री?

हे वाचलं का?