Maharashtra Flood 2021 : महाराष्ट्रातली पूरस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार चुकलं का? समजून घ्या
महाराष्ट्रातल्या सद्य पूरस्थितीने सगळ्यांनाच 2019 मधील पूरस्थितीची आठवण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगडमधले अनेक तालुके जलमय झालेत, तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या कोकण पट्ट्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा होता, रेड-ऑरेंज अलर्ट देण्यात आले होते, मग तरीही आपत्ती व्यवस्थापन का धड होऊ शकलं नाही? लोकांना मदत पोहोचायला उशीर झाला का? अलर्ट असतानाही […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या सद्य पूरस्थितीने सगळ्यांनाच 2019 मधील पूरस्थितीची आठवण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगडमधले अनेक तालुके जलमय झालेत, तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या कोकण पट्ट्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा होता, रेड-ऑरेंज अलर्ट देण्यात आले होते, मग तरीही आपत्ती व्यवस्थापन का धड होऊ शकलं नाही? लोकांना मदत पोहोचायला उशीर झाला का? अलर्ट असतानाही टीम आधीच तैनात करण्यात आलेल्या की तहान लागल्यावर विहीर खणायला सुरूवात झाली? आपत्ती व्यवस्थापन नेमकं काम कसं करतं? आज याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात…
भारतीय हवामान विभागाने 18 ते 22 जुलैदरम्यान कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्राला रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेला. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, हे ही सांगण्यात आलेलं. मग या इशाऱ्यानुसार आपल्या यंत्रणा सज्ज होत्या का?
Flood in Maharashtra : सांगलीला पुराचा वेढा कायम, ‘या’ कारणामुळे पाणी ओसरायला होतो आहे उशीर
रेड अलर्टमध्ये यंत्रणांना तयारी करण्यासाठीही वेळ नसतो, तर तातडीने अक्शन घेण्याची गरज असते. हे अलर्ट लोकांपेक्षाही खासकरून सरकार आणि प्रशासनासाठी असतात, जेणेकरून लोकांचे जीवही वाचतील, आणि सार्वजनिक संपत्तीचंही नुकसान होणार नाही.