आर्यन खान प्रकरणातील NCB चे दोन तपास अधिकारी निलंबित, कारण गुलदस्त्यात

दिव्येश सिंह

आर्यन खान प्रकरणातील दोन तपास अधिकारी निलंबित झाले आहेत. त्यामागे नेमकं कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्व विजय सिंग हे आर्यन खान प्रकरणातले इंटेलिजन्स ऑफिसर आहेत. तर प्रसाद हे देखील याच केसशी संबंधित काम बघत होते. या दोघांचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

आर्यन खान प्रकरणातील दोन तपास अधिकारी निलंबित झाले आहेत. त्यामागे नेमकं कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्व विजय सिंग हे आर्यन खान प्रकरणातले इंटेलिजन्स ऑफिसर आहेत. तर प्रसाद हे देखील याच केसशी संबंधित काम बघत होते.

या दोघांचं निलंबन का करण्यात आलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आर्यन खान प्रकरणातील या दोन अधिकाऱ्यांची vigilance inquiry केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

२ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर NCB ने छापा मारला होता. जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती NCB ला मिळाली होती. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या तिघांसह एकूण ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

हे वाचलं का?