ठाकरे सरकारची उद्याच ‘बहुमताची परीक्षा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पत्रात काय म्हटलंय?

मुंबई तक

राज्यात सुरू असलेल्या घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. ठाकरे सरकारचं काय होणार असा प्रश्न सगळीकडेच चर्चिला जात असून, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी उद्याच (३० जून) अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राज्यात सुरू असलेल्या घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. ठाकरे सरकारचं काय होणार असा प्रश्न सगळीकडेच चर्चिला जात असून, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी उद्याच (३० जून) अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानं सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले होते. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील राजकारण याच भोवती फिरत असून, सरकारच्या भवितव्याबद्दलची महत्त्वाची घडामोड घडली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र पाठवण्यात आलं असून, गुरूवारी, ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

हे वाचलं का?