बेडफोर्ड ते ‘ई-शिवाई’… लालपरीचं कसं बदलतं गेलं रूप?, हा इतिहास तुम्हाला माहितीये का?

मुंबई तक

लालपरीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी का म्हणतात याची प्रचिती, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेकांनी घेतली. कोसो दूर असलेल्या वाड्या वस्त्यांना शहरांना जोडण्याचं काम करते ती लालपरी. जसा जसा काळ बदलत गेला, तसं तसे एसटीच्या रंग रुपात बदल होते गेले. काळाने कात टाकली आणि जनसामान्यांचा विश्वास असलेली लालपरीही आधुनिक स्वरुपात आली. जगभरात ग्लोबल वार्मिंगबद्दल चिंता व्यक्त असताना आता […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

लालपरीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी का म्हणतात याची प्रचिती, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेकांनी घेतली. कोसो दूर असलेल्या वाड्या वस्त्यांना शहरांना जोडण्याचं काम करते ती लालपरी.

जसा जसा काळ बदलत गेला, तसं तसे एसटीच्या रंग रुपात बदल होते गेले. काळाने कात टाकली आणि जनसामान्यांचा विश्वास असलेली लालपरीही आधुनिक स्वरुपात आली.

जगभरात ग्लोबल वार्मिंगबद्दल चिंता व्यक्त असताना आता लालपरीनेही आपल्या ताफ्यात आधुनिक ईलेक्ट्रिक शिवाई बस समाविष्ट करून घेतलीये.

काळानुरूप बदलत गेलेल्या एसटी बसेसची गोष्टही रंजक आहे.

महाराष्ट्रात पहिली लालपरी धावली 1 जून १९४८ रोजी. पहिला प्रवास होता अहमदनगर ते पुणे. या बस सेवेला 74 वर्ष पूर्ण झाली.

या निमित्ताने राज्यात महाराष्ट्रातील पहिली ई- बस सुरु करण्यात आलीये. जिचं नाव आहे शिवाई… ही बसदेखील पहिल्यांदा अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावणार आहे.

अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानकातून पहिली बस पुण्याकडे रवाना झाली होती. आता हीच शिवाई बस एका चार्जिंगमध्ये सुमारे तीनशे किलोमीटर धावणार आहे.

बसची लांबी 12 मीटर असून त्यात टू बाय टू आसनव्यवस्था आहे.

यामध्ये एकूण 43 आसने असतील. बसमध्ये एसीची सुविधा आहे आणि ही बस ताशी 80 किमी वेगाने रस्त्यावर धावेल. बसची बॅटरी क्षमता 322 kV असल्याचंही म्हटलं जातंय.

1 जून 1948 साली निळ्या – चंदेरी रंगाची बस नगर – पुणे – नगर या मार्गावर धावली. ही बस लाकडी होती. कात्या सीट आणि ताडपत्री लावल्या खिडक्या.

1950 मध्ये मॉरिश कमर्शियल कंपनीच्या बसेस एसटी महामंडळात रुजू झाल्या. निलकमल आणि गिर्यारोहणी नावाच्या बस पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर धावू लागल्या.

1953 मध्ये एसटीने शेतमाल, बांधकाम साहित्याची वाहतूक करण्याच्या क्षेत्रात पाय टाकलं. आणि 853 ट्रकसह व्यावसायिक मालवाहू सेवा सुरु केली.

1960 साली 35 जागांच्या बसची क्षमता 50 पर्यंत गेली. टाटा मर्सडीज बेंझच्या सांगाड्याचे रुंदीकरण केले. इतकंच नाही तर रंग बदलला. निळ्या चंदेरी रंगाच्या जागी लाल पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला.

1962 च्या भारत, चीन आणि 1965 च्या भारत, पाकिस्तान या युद्धांमध्ये एसटीने 80 बसेस संरक्षण खात्याला पुरवल्या.

1964 साली एसटीने आराम बसची निर्मिती केली, खिडक्यांना पडदे, आरसा, घड्याळ, छताला पंखे, रेडिओ स्पीकर, 2 बाय 2 आसन व्यवस्था या लक्झरी बसमध्ये करण्यात आली.

1965 मध्ये दापोडी आगाराने 30 आसनांची क्षमता असलेल्या पहिल्या वातानुकुलित बसची निर्मिती केली.

1970 मध्ये पहिल्या शयन आसनी बसची निर्मिती करण्यात आली. ही बस सर्वात आधी मुंबई ते पणजी मार्गावर धावली.

1970 मध्ये लेलँड कंपनीने पुढील दाराच्या बसची निर्मिती केली. यामध्ये 56 प्रवाशांची आसन व्यवस्था होती.

आता रस्त्यावर दिसणारी दुमजल्या बसचीनिर्मिती 1981 मध्ये झाली, शहरातील गर्दीमुळे हा पर्याय काढण्यात आला.

1982 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धेसाठी एसटीने 200 बसेस दिल्या होत्या, त्यापैकी 50 बसेस या एशियाड नावाने दादर ते पुणे मार्गावर धावू लागल्या.

1993 मध्ये डिलक्स सेवेत रुजू झाली. सीट कव्हर, डोक्याला उशी, पडदे, रिडींग लँप, पंखे अशी व्यवस्था यामध्ये होती.

1996 मध्ये वातानुकुलिय डिलक्स बस सेवेत आलीय अनेक यंत्रणा यामध्ये असल्याने या बसचं वेगळं आकर्षण होतं.

1998 मध्ये एअर बस सेवेत आली. जी बस आजी तुम्ही शिवशाही किंवा शिवाई म्हणून पाहत आहात, अगदी त्यासारखी.

सामान्यांना परवडण्यासाठी एसटीने 1999 साली साधी बस तयारी केली. मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करुन आणि अनेकांना कमी पैशात प्रवास करता यावा म्हणून या बसची निर्मिती झाली.

2002 मध्ये दादर ते पुणे मार्गावर शिवनेरी बस धावली. स्विडीश बनावटीच्या या बसमध्ये आत्याधुनिक सर्व सुविधा होत्या.

मोठ्या खिडक्या, आरामदायी बैठक अशी रचना असलेली परिवर्तन बस 2005 मध्ये आली. आणि इथून पुढे एसटीचा चेहरा बदलला.

65 आसने, 20 उभे प्रवासी अशी एकूण 85 प्रवाशांची ने आण करु शकेल अशी वारी बस 2008 मध्ये रस्त्यावर धावली.

2009 मध्ये एसटी महामंडळाने सीएनजी बसची निर्मिती केली. डिझेलला पर्याय म्हणून देखील याकडे पाहिलं जायचं.

5 वी ते 12 च्या विद्य़ार्थ्यांसाठी गाव ते शाळा अशी मोफत बस 2012 मध्ये रस्त्यावर धावली. 22 जिल्ह्यांमध्ये 125 बसेस धावल्या होत्या.

2015 मध्ये नाशकात कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं. इथल्या भाविकांच्या प्रवासासाठी 4321 सिंहस्थ कुंभमेळा बस रस्त्यावर धावल्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp