Jayant Patil :”एकनाथ शिंदे दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं करू शकतात, कारण…”

मुंबई तक

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय उलथापालथीचं उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. हे विधान करताना जयंत पाटलांनी पार्श्वभूमीही मांडली. दुसरीकडे शिवसेनेच्या चिन्हाशिवाय निवडणुका लढवण्याची उद्धव ठाकरेंची तयारी असून, त्यांना सोबत घेऊ, असं अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. ‘शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार, खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय उलथापालथीचं उदाहरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं. हे विधान करताना जयंत पाटलांनी पार्श्वभूमीही मांडली. दुसरीकडे शिवसेनेच्या चिन्हाशिवाय निवडणुका लढवण्याची उद्धव ठाकरेंची तयारी असून, त्यांना सोबत घेऊ, असं अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

‘शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार, खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेबरोबर देवेंद्र फडणवीसांनीही घेतलीये. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील सुनावणी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे असं दिसतंय की, शिंदेकडून शिवसेनेवर दावा करण्याचे प्रयत्न होताहेत. उद्धव ठाकरेंना चिन्हं मिळालं नाही, तर त्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असणार आहे का?’, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी (जयंत पाटील) सविस्तर भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंना चिन्हा चिंता नाही, असं मला वाटतंय; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले, “मी काही शिवसेनेचा प्रवक्ता नाहीये, पण मला असं दिसतंय की उद्धव ठाकरेंची ती तयारी आहे. शिवसेनेचं चिन्हं त्यांच्याकडे राहिल असा त्यांचा आशावाद असावा, पण चिन्हापेक्षा आता काँग्रेसने किती वेळा चिन्ह बदललं. पूर्वी बैलजोडी होती. मग गायवासरू आलं. आता हात आला. पूर्वी तर काही यंत्रणा नसताना चिन्हांचा प्रसार झाला. आता दोन सेकंदात नवं चिन्ह महाराष्ट्राला आणि देशाला कळतं.”

उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल; ‘मातोश्री’वरील भेटीनंतर जयंत पाटलांचं विधान

हे वाचलं का?