SSC-HSC exam: 10 वी, 12 वीच्या परीक्षेवरील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

मुंबई: राज्यातील दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Exam) सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेत बारावीच्या परीक्षेचा (HSC exam) देखील मुद्दा नमूद करण्यात आला होता. दरम्यान, याच याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे (Bombay High Court) मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज (1 जून) सुनावणी झाली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यातील दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Exam) सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेत बारावीच्या परीक्षेचा (HSC exam) देखील मुद्दा नमूद करण्यात आला होता. दरम्यान, याच याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे (Bombay High Court) मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज (1 जून) सुनावणी झाली.

सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला कोर्टाने स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, 10 वी, 12 वीच्या परीक्षेविषयीची सुनावणी गुरुवारपर्यंत (3 जून) पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, आजची ही सुनावणी ऑनलाइन पार पडली.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं. ज्यामध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करावी आणि 12 वीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असं म्हणटं आहे. कारण की, सध्या परीक्षा घेण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती नसल्याचे महाराष्ट्र शासनाने आपल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

देव या राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचं भलं करो, दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे

हे वाचलं का?

    follow whatsapp