Movad Flood ला 30 वर्ष पूर्ण, महापुरामुळे 204 गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी

मुंबई तक

योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर मोवाड येथे ३० जुलै ( सन १९९१ ) च्या पहाटे मोवाडपासून तर उतारा उतारा या गावापर्यंत वर्धा नदीने रौद्ररूप धारण केले होते. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापूराने असंख्य वेदना देत आजही आठवणी कायम आहे. एकमेकांना कवेत घेत होत्याचे नव्हते झाले. नदीच्या काठावरील 12 गावांसाठी वर्धा नदी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर

मोवाड येथे ३० जुलै ( सन १९९१ ) च्या पहाटे मोवाडपासून तर उतारा उतारा या गावापर्यंत वर्धा नदीने रौद्ररूप धारण केले होते. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापूराने असंख्य वेदना देत आजही आठवणी कायम आहे. एकमेकांना कवेत घेत होत्याचे नव्हते झाले. नदीच्या काठावरील 12 गावांसाठी वर्धा नदी कोपली होती. तिने मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला 30 वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काट्याचे शहारे उभे राहतात.

30 वर्षा अगोदर महापूराच्या पाण्याने लोकांना मारले आणि आता तहानलेले मोवाडवासी व्याकूळ होत आहे. त्यानंतर कधी महापूर आलाच नाही. दरवर्षी प्रमाने या वर्षी सुध्दा मोवाडवासी नागरिक ३० जुलै हा जखमेचा काळा दिवस म्हणून पाळतात. व्यापारी दुकाने बंद ठेवतात. प्रत्येक घरचा नागरिक श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जातात. या महापूरानंतर मोवाड गाव सावरले तरी शासकीय यंत्रणेच्या अपयश पावलो पावली जानवते. त्यामुळे गावाचे गावपण यायला पुन्हा किती दिवस वाट बघावी लागेल. या आशेवर येथील प्रत्येक नागरिक वाट बघत आहे. मोवाडवासी सावरले नाहीत. ३० जुलै १९९१ च्या घटनेला ३० वर्षे पूर्ण होत आहे. परंतु महापूराच्या धक्क्याने आजपर्यत मोवाडवासी सावरले नाही.

हे वाचलं का?