Impact: हायकोर्टाच्या दणक्यानंतर खिरखिंडी गावातील विद्यार्थ्यांना मिळणार फायबर बोट, पाहा लाइफ जॅकेट कुणी दिलं

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्या वतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मुंबई Tak ने दिलेल्या वृत्तानंतर स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली. ज्यानंतर संपूर्ण प्रशासन हे खडबडून जागं झालं. त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकारी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट दिली आणि नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली.

जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 25 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूलमध्ये जावे लागते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सह्याद्री वाघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असलेल्या खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी व कुसापूर या गावातील 70 कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एकसाल सागाव या ठिकाणी वन्य विभागाने केले असून त्यासाठी 242 हेक्टर जमीन संपादित केली आहे. 70 कुटुंबापैकी 6 कुटुंबांनी जमीन ताब्यात घेतलेली नाही.

ते एकसाल सागाव या गावी जावून जमीन ताब्यात न घेता परत आले आहेत. तसेच 1 कुटुंब यांनी जमीन ताब्यात घेतली असून ते परत खिरखिंडी येथे वास्तव्यास आले आहेत. अशी एकूण 7 कुटुंबातील 25 लोक खिरखिंडी येथे राहतात. त्याच कुटुंबातील एकूण 8 मुले (4 मुले व 4 मुली) अंधारी येथील हायस्कूलला शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात.

ADVERTISEMENT

त्यासाठी मौजे खिरखिंडी गावातील 4 मुले व 4 मुली यांना घरापासून ते कोयना जलाशय किनाऱ्यापर्यंत येण्यासाठी 10 मिनिटे लागतात तेथून पुढे कोयना जलाशयातील 600 मीटर प्रवास बोटीने करावा लागतो. तेथून पुढे अंधारी येथील हायस्कूलला फळणीमार्गे पायी जाण्यासाठी साधारणत: एक तास इतका वेळ लागतो.

ADVERTISEMENT

मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूल हे अनिवासी हायस्कूल आहे. तथापी मौजे अंधारी येथे कसाईदेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अंधारी-कास ही निवासी आश्रमशाळाही आहे. दरम्यान, खिरखंडी गावचे विद्यार्थी हे दररोज प्रवास करुन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्यांना लाईफ जॅकेट पुरविले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी लवकरच फायबर बोटीचीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

मुबंई Takच्या बातमीमुळे मुलांना मिळालं लाईफ जॅकेट

कोयना धरणाचे बॕक वाटर असणाऱ्या शिवसागर जलाशयायातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांची विदारक परिस्थिती ‘मुबंई Tak’ने समोर आणल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. तथापि, शासन स्तरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सातारचे सामाजिक कार्यात निस्वार्थपणे अग्रेसर असणारे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मात्र उत्तम दर्जाचे सेफ्टी लाईफ जॕकेट प्रत्यक्ष त्या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेट दिले आहेत. या जॅकेटमुळे असुरक्षित विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले आहेत.

खिरखंडी हे गाव शिवसागर जलाशयाच्या पलिकडे असून ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा क्षेत्रात येते. येथील मुलांना गेली अनेक वर्षापासून शिक्षणासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या गावात फक्त पाचवीपर्यतचीच शाळा असून पुढच्या शिक्षणासाठी मुलांना शिवसागर जलाशयातून विनायकनगर असा प्रवास करावा लागत आहे.

Impact: ‘मुंबई Tak’ने डोळ्यात अंजन घालणारं वास्तव आणलं समोर, आता ‘सावित्रीच्या लेकीं’साठी हायकोर्टानेच उघडलं दार!

वादळ, वारा, पाऊस याची तमा न बाळगता खिरखंडीतील ही मुले स्वतः होडी वल्हवत जा-ये करत असतात. खरंतर, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक अशा स्वरुपाची असल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी शासनासह समाजातील सर्व घटकांनी स्वातःच्या खांद्यावर पेलायला हवी. नेमक्या याच सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून सुहास राजेशिर्के यांनी प्रत्यक्ष या मुलांची भेट घेतली.

माजी आमदार जी.जी. कदम प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोहाट – अंधारी येथील प्राचार्य सिताराम गंगाराम पडगे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंधारी येथील मुख्याध्यापक संतोष कदम यांच्याशी चर्चा करून एकूण परिस्थिती जाणून घेतली.

डोंगराळ-दुर्गम भागातील मुलांना शालेय स्तरावरील सर्व प्रकारच्या सेवासुविधा मिळायला हव्यात. सातारच्या जिल्हाप्रशासनाने तसेच मंत्रीमहोदयांनी याकडे माणुसकीच्या भूमिकेतून सहानुभूतीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा सुहास राजेशिर्के यांनी यादरम्यान व्यक्त केली.

सातारा : डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा प्रवास, स्वत:च चालवतात होडी

‘सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करेल तेव्हा करेल परंतु ज्यांना शक्य आहे अशा समाज घटकांनी या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुढे यायला हवे. मला जे शक्य आहे ते मी केले आहे. मी खूप काही वेगळे केले असे अजिबात नाही, तर माझे मी कर्तव्य पार पाडले आहे.’

‘भविष्यातही या दुर्गम भागातील मुलांच्या अडचणीच्या काळात माझी साथ कायम राहील.’ असा विश्वासही यावेळी सुहास राजेशिर्के यांनी तेथील लोकांना दिला. जॅकेट वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर शिक्षकांनी सुहास राजेशिर्के यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT