Pratap Sarnaik: ‘सरनाईकांचं ‘ते’ पत्र म्हणजे भाजपकडून सरकार अस्थिर करण्याची खेळी आहे’

मुंबई तक

कोल्हापूर: ‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे भाजपची महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी असावी.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. जोवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोवर या सरकारला कोणीही धक्का लावू शकत नाही. असा दावा देखील यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोल्हापूर: ‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामागे भाजपची महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची खेळी असावी.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

जोवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोवर या सरकारला कोणीही धक्का लावू शकत नाही. असा दावा देखील यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.

‘भाजपची सरकार अस्थिर करण्याची एक खेळी’

‘शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहलं आहे ती सुद्धा भाजपची सरकार अस्थिर करण्याची एक खेळी आहे. प्रताप सरनाईक हे माझे चांगले मित्र आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दहा वर्षापूर्वी ते शिवसेनेत गेले आणि आता सध्या ते आमदार आहेत.’

हे वाचलं का?

    follow whatsapp