आधी गोळी मारली नंतर गळा चिरला अन् प्रेत दिलं नदीत फेकून, भाऊच का झाला भावाचा वैरी?

मुंबई तक

Crime News : आपल्याच पत्नीसोबत शारिरीक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने चुलत भावाच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गळा दाबत त्याचा खून करत ते प्रेत एका नदीत फेकून देण्यात आले. या प्रकरणाचा खुलासा पाच महिन्यानंतर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News In Uttar Pradesh the real reason behind brother shooting at brother has come to light
Crime News In Uttar Pradesh the real reason behind brother shooting at brother has come to light
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीशी संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने चुलत भावाच्या डोक्यात झाडली गोळी

point

गळा दाबत त्याचा खून करत ते प्रेत एका नदीत फेकून देण्यात आले

Crime News : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्याच पत्नीसोबत शारिरीक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने चुलत भावाच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गळा दाबत त्याचा खून करत ते प्रेत एका नदीत फेकून देण्यात आले. या प्रकरणाचा खुलासा पाच महिन्यानंतर करण्यात आला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपी पतीचं नाव हे अक्षय असे आहे. तो गेली पाच महिने फरार झाला होता. एका बूटाच्या पुराव्यावरुन या घटनेची पोलखोल झाली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बागपतच्या खेकरा पोलीस ठाणे परिसरातील आहे.

हेही वाचा : राशीभविष्य : जूनमध्ये सूर्य आणि गुरूची युती, 'या' राशीच्या लोकांची लागणार लॉटरी

5 महिन्यांपूर्वी हिंमाशू नावाच्या एका तरुणाची अनैतिक संबंधाच्या संशयावरुन हत्या करण्यात आली. हिंमाशू हा मेरठच्या चुर गावातील रहिवाशी आहे. हिमांशूचे त्याचाच चुलत भाऊ असणाऱ्या अक्षयच्या पत्नीशी संबंध असल्याचा आरोप होता. जेव्हा त्याचा भाऊ कामावर जायचा, तेव्हा हिमांशू  त्याच्या घरी यायचा आणि अक्षयच्या पत्नीला भेटायचा. आरोपी अक्षयने हिमांशूला बोलव असे आपल्या पत्नीला सांगितलं होते. 

आपल्या पतीच्या सांगण्यावरुन पत्नीने हिमांशूला बोलावले. त्यानंतर हिमांशू तेथे पोहोचला असता, भावानेच हिमांशूवर गोळीबार केला आणि हिमांशूच्या मानेवर वार करत त्याचा गळा चिरला. त्यानंतर तो मृतदेह हिंडन नदीत फेकण्यात आला. यानंतर कुटुंबाला तीन दिवसांपर्यंत हिमांशूचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. त्यावेळी तो बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 

काही महिने उलटल्यानंतर हिमांशूच्या कुटुंबियांनी संबंधित प्रकरणावरुन संशय व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणात 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान आरोपी अक्षय हा घटनास्थळावरुन पळून गेला. अक्षयला शोधण्यासाठी पोलिसांनी 25 हजारांचं बक्षीस जाहीर केलं. त्यानंतर अक्षय तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांच्या तावडीत सापडला. हिमांशूच्या बूटावरुन या प्रकरणाची माहिती समोर आली. 

हेही वाचा : कुणी चहा घेत होतं, कुणी गप्पा मारत होतं... कार आली आणि सर्वांना चिरडून गेली, सदाशिव पेठेत काय घडलं?

या प्रकरणात पोलीस म्हणाले की, खेकरा परिसरात हिमांशूच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. ज्यात अक्षय फौजी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पत्नीशी शरीरसंबंधाच्या संशयावरुन त्याने आपल्या भावाचा खून केला.  

हे वाचलं का?

    follow whatsapp