Sambhajiraje उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) वर्षा या ठिकाणी पोहचलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंमध्ये काय चर्चा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच त्यांना शरद पवारांनीही पाठिंबा दिला आहे. अशात आता संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचणं हे सूचक आहे. यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. या […]
ADVERTISEMENT

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) वर्षा या ठिकाणी पोहचलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंमध्ये काय चर्चा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच त्यांना शरद पवारांनीही पाठिंबा दिला आहे. अशात आता संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचणं हे सूचक आहे. यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.
या दोन नेत्यांमध्ये सुमारे ३५ ते ४० मिनिटं चर्चा झाली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.
संभाजीराजे राज्यसभेची आगामी निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवत असले तरी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुसरी मोठी घोषणा केली ती म्हणजे, त्यांच्या नव्या ‘स्वराज्य’ या संघटनेची त्यांनी घोषणा केली आहे. याच संघटनेबाबत ते असंही म्हणाले की, ‘उद्या स्वराज्य ही संघटना राजकीय पक्षात रूपांतर झाल तर वावगं समजू नका.’ त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या अधिकृतरित्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आहे यात शंका नाही. अशात त्यांनी आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.