खरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे!

मुंबई तक

देशाचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा, नवा व आधुनिक भारत घडवण्यासाठी म्हणजे सर्व प्रकारच्या विषमता व सर्व प्रकारचे वैरभाव नष्ट करून, एकसंध व एकात्म आणि सुखी समाधानी भारत घडवणे हे आपले ध्येय असले पाहिजे, त्यासाठी लढत राहणे हे आपले कर्तव्य आहे, अशी साने गुरुजींची पक्की धारणा होती. त्यासाठी त्यांना अस्पृश्यता निर्मूलन विशेष महत्वाचे वाटत होते आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशाचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा, नवा व आधुनिक भारत घडवण्यासाठी म्हणजे सर्व प्रकारच्या विषमता व सर्व प्रकारचे वैरभाव नष्ट करून, एकसंध व एकात्म आणि सुखी समाधानी भारत घडवणे हे आपले ध्येय असले पाहिजे, त्यासाठी लढत राहणे हे आपले कर्तव्य आहे, अशी साने गुरुजींची पक्की धारणा होती. त्यासाठी त्यांना अस्पृश्यता निर्मूलन विशेष महत्वाचे वाटत होते आणि म्हणून त्यांनी पहिला कृती कार्यक्रम हाती घेतला, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे म्हणून त्यांनी जानेवारी ते एप्रिल 1947 अशी चार महिने महाराष्ट्राचा दौरा केला, एकट्या पश्चिम महाराष्ट्रात 400 सभा घेतल्या, त्यातून गावोगावची 300 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली. पंढरपूर मंदिराच्या बडव्यांनी मात्र दाद दिली नाही…

अखेरीस 1 मे रोजी साने गुरुजींनी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू केले, महाराष्ट्रात खळबळ माजली. उपोषण मागे घ्यावे अशी तार म. गांधीनी केली. भारताच्या हंगामी लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळंकर यांना मध्यस्ती करायला पाठवले. पण गुरुजी आपल्या निश्चयावर ठाम राहिले… आणि मग बडव्यांनी माघार घेतली आणि 10 मे च्या रात्री उपोषण सुटले. 11 मे च्या सकाळी विठ्ठल मंदिरात स्पृश्य व अस्पृश्य यांनी एकत्रित प्रवेश केला. त्या घटनेला आज 75 वे वर्ष सुरू होत आहे. त्या उपोषण काळात म्हणजे 9 मे च्या रात्री आचार्य अत्रे यांनी पंढरपूर येथील सभेत केलेले हे अफलातून भाषण आहे, हशा आणि टाळ्या यांनी सजलेले, मात्र मार्मिक व उद्बोधक!

आज पहिल्यानंच मी पंढरपूरला आलो आहे. मी आज जो आलो तो देवळातल्या तुमच्या पांडुरंगाच्या दर्शनाला काही आलो नाही; पण देवळाबाहेर मरणाच्या दारी बसलेल्या आमच्या एका पांडुरंगाच्या भेटीसाठी इथं आलो आहे (टाळ्या). तुम्ही माझे व्याख्यान ऐकायला जमला आहात; पण मी काही तुमच्यापुढं व्याख्यान द्यायला आलो नाही. व्याख्यान द्यायची ही वेळ नाही. दुपारी तनपुरे महाराजांच्या मठात जाऊन मी साने गुरुजींना पाहिलं. नऊ दिवसांच्या उपोषणानं त्यांचं शरीर थकून गेलेलं आहे. त्यांची जीवनशक्ती अगदी क्षीण झालेली आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांची प्राणज्योत मंद होत चाललेली आहे. त्यांचे प्राण कसे वाचतील?-हा तुमच्या-आमच्यापुढे आता प्रश्न आहे. बोला,- महाराष्ट्रामधला एक महात्मा तुमच्या ह्या गावामध्ये मृत्यूच्या मांडीवर येऊन तडफडत आहे. त्याला तुम्ही वाचवणार आहात की नाही? ह्या एकाच प्रश्नाचा जबाब मला आज तुमच्याकडून पाहिजे आहे. साने गुरुजींची ती करुण मूर्ती पाहिल्यापासून माझ्या डोक्यात आता दुसरा विचार नाही. दुसरं काही सुचत नाही की रुचत नाही. ह्या एकाच विचारानं माझी नाडी उडते आहे. छाती धडधडते आहे, आणि काळीज तडफडते आहे. मी आनंदी आणि हसरा मनुष्य आहे. मी स्वतः हसतो आणि दुसऱ्यांना हसवतो. पण आज मला हसू येत नाही. साने गुरुजींना पाहिलं आणि माझं हसूच आटून गेलं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

साने गुरुजींचं वाङ्ममय वाचलं की काळीज विरघळतं आणि डोळ्यांत पाणी येतं, असा सर्वांचा अनुभव आहे तो खरा आहे. साने गुरुजी म्हणजे करुणरसाचा हृदयस्पर्शी झरा आहे. साने गुरुजी म्हणजे मूर्तिमंत कारुण्य. त्याचा अनुभव आज मला आला. मी त्यांना पाहिलं आणि मला रडूच कोसळलं! कधी न रडणारा माणूस मी,- पण आज रडलो मी. म्हणून हसण्याच्या अपेक्षेनं जर कुणी ह्या सभेत आलं असेल तर त्याची निराशा होईल. आपण हिंदुस्थानातील हिंदू फार मठ्ठ डोक्याचे लोक आहोत. गोष्टी घडून गेल्यानंतर त्या आपल्याला कळतात. त्या घडत असताना आपल्या ध्यानात येत नाहीत. तीनशे-चारशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात मोठमोठे साधू आणि संत होऊन गेले. ते जिवंत असताना त्यांचं माहात्म्य आपल्याला कळलं नाही. त्यांचा आपण त्या वेळी अनन्वित छळ केला, आणि मग ते मेल्यावर त्यांच्या पालख्या खांद्यावर घेऊन आपण ‘ग्यानबा तुकाराम’ करुन नाचायला लागलो. जिवंतपणी माणसाला पायाखाली तुडवायचं आणि मेल्यानंतर त्याला खांद्यावर नाचवायचं हा आपला नेहमीचाच शिरस्ता आहे! आणि तोच शिरस्ता आजही ह्या घटकेला इथं पंढरपूरला आपण चालवलेला आहे. मागं एवढा इतिहास घडून गेला, त्यानं आपल्याला शहाणपणा आलेला नाही, की आपले डोळे उघडले नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp