Shiv Sena vs BJP: ‘आमचा बाप दिल्लीचा, ही विरोधकांची भूमिका कितपत योग्य?’, ‘सामना’तून भाजपवर तुफान टीका

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यासारख्या संकटाला तोंड देत आहे. या संकटात शेकडो जणांचे हकनाक बळी गेले आहेत. असं असताना आता राजकीय पातळीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवत आहे. त्यातच आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर अत्यंत बोचरी आणि तुफान टीका करण्यात आली आहे. ‘तळीयेसारख्या गावांचे पुनर्वसन करणे हे केंद्राचे नसून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यासारख्या संकटाला तोंड देत आहे. या संकटात शेकडो जणांचे हकनाक बळी गेले आहेत. असं असताना आता राजकीय पातळीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवत आहे. त्यातच आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर अत्यंत बोचरी आणि तुफान टीका करण्यात आली आहे.

‘तळीयेसारख्या गावांचे पुनर्वसन करणे हे केंद्राचे नसून राज्याचेही कर्तव्य आहे. केंद्र सरकार हे राज्याराज्यांचे मायबाप आहेच. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. पण ‘आमचा बाप दिल्लीचा’ ही भूमिका राज्यातील विरोधी पक्षाणे घेणे कितपत योग्य आहे?’ असा सवाल करत शिवसेनेने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

पाहा ‘सामना’च्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे

  • महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे. त्यामुळे तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल.

हे वाचलं का?