ही देशाच्या जनतेला अफूच्या धुंदीत ठेवायची प्रयोगशाळा – Kashmir Files वरुन सेनेची भाजपवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

The Kashmir Files चित्रपटावरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे. भाजपशासिक राज्य सरकारनी हा चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर इतर राज्यांवरही भाजप नेते हा दबाव टाकत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सिनेमाचं कौतुक केलं असून आपल्या सर्व खासदारांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. परंतू भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात, काश्मिर फाईल्स चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणाला, ही तर देशातील जनतेला गुंगीत आणि अफूच्या धुंदीत ठेवण्याची प्रयोगशाळा असल्याचं म्हटलंय.

“द कश्मीर फाईल्स दहशतवाद्यांचा कट असू शकतो, कारण…”; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी लगेच गुजरातला गेले आणि तिकडे त्यांनी विजयोत्सव साजरा केला. कारण यापुढच्या निवडणुका गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी भाजपने हिजाबचा मुद्दा लावून धरला. हिंदू-मुस्लीम समाजात दरी निर्माण केली. धर्म आणि जात याबाबत कमालीचा द्वेष निर्माण केला की लोकांना जगण्या-मरण्याच्या प्रश्नाचा विसर पडतो. आता पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी संघ परिवाराच्या प्रेरणेने द काश्मिर फाईल्स नावाचा सिनेमा पडद्यावर आणला आहे.

निकष काय आहेत?; ‘द कश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यावरून ‘झुंड’च्या निर्मात्याच्या सवाल

ADVERTISEMENT

या चित्रपटाची सूत्र आता मोदींनी हाती घेतली आहेत. काश्मिरच्या बाबतीत ३२ वर्षांनी खरा इतिहास समजतोय असं या चित्रपटाच्या निमीत्ताने भासवलं जातंय. भाजपशासिकत राज्यांत हा चित्रपट करमुक्त केला जातोय. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तर तर सरकारी कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहता यावा यासाठी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. तिकीट दाखवा आणि सुट्टी घ्या हा प्रकार मजेशीर म्हणावा लागेल. देशाच्या जनतेला कोणत्या गुंगीत आणि अफूच्या धुंदीत ठेवण्याची प्रयोगशाळा उघडली जात आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे.

ADVERTISEMENT

The Kashmir Files : “…, पण ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने सगळा सत्यनाश केला”

आजच्या सदरात संजय राऊत यांनी काश्मिर फाईल्स सिनेमाच्या निमीत्ताने काही प्रश्न भाजप सरकारला विचारले आहेत.

१) काश्मिरी पंडितांचं पलायन आणि हत्या झाल्या तेव्हा दिल्ली आणि काश्मिरमध्ये सत्ता कोणाची होती?

२) काश्मिरी पंडीतांवर जसे अत्याचार झाले, त्यांना विस्थापीत व्हायला लागलं. त्याच प्रमाणे शीख आणि मुसलमान समाजातील लोकांच्याही हत्या झाल्या. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हजारो शीख आणि मुसलमानांचं शिरकाण केलं. सुरक्षा दलातील अनेक मुसलमान जवानांची हत्या करण्यात आली.

३) काश्मिरात अतिरेकी संघटनांशी हातमिळवणी करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व त्यांच्या पक्षाशी युती करुन काश्मीरमध्ये भाजपने सरकार कसं स्थापन केलं? पंडितांच्या हत्येचा साधा निषेधही या लोकांनी केला नाही. अफजल गुरुला स्वातंत्रसैनिकाचा दर्जा, बुरहान वानीवर केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं तेव्हा सरकारमध्ये असलेले भाजपचे मंत्री हा प्रकार थंडपणे सहन का करत होते?

४) पाकव्याप्त काश्मीर जिंकून पुन्हा अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तुमच्या घोषणेचं काय झालं?

५) काश्मिरी पंडीतांची घरवापसी कधी होणार, की त्यांचा आक्रोश, त्यांचे पलायन आणि रक्तपात यावर फक्त राजकारणच होत राहणार?

या लेखात संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीत काश्मिरी पंडीतांसाठी घेतलेल्या पुढाकाराची आठवण करुन देत भाजपला चांगलंच सुनावलं आहे. द काश्मिर फाईल्स सारखे चित्रपट तयार व्हायला हवेत पण अशा चित्रपटांचा राजकीय अजेंडा विरोधकांबाबत द्वेष आणि भ्रम फैलावणे असाच झाला आहे. काश्मीर फाईल्समध्ये सत्य बातम्या दाखवताना इतर अनेक प्रखर सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. काश्मीरमध्ये जेव्हा पंडितांवर अत्याचार सुरु होते तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठींब्यावर व्ही.पी.सिंग यांचं सरकार होतं. भाजपचे नेते जगमोहन हे काश्मीरचे राज्यपाल होते. खोऱ्यात जेव्हा हिंदू पळत होते तेव्हा काश्मिर फाईल्स थंड बासनात पडून होती अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT