राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचं संकट?; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले संकेत

मुंबई तक

लोडशेडींग मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न राज्याच्या राजकारणात अनेकदा दाखवलं जातं. परंतू सध्या राज्यावर पुन्हा एकदा लोडशेडींगचं संकट घोंगावत आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीच याबद्दलचे संकेत दिले आहेत. ते अकोल्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. अकोला जिल्ह्यातील दोन विद्युत प्रकल्पांचं उद्घाटन नितीन राऊत यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलत असताना नितीन राऊत यांनी ग्राहकांना वीजबील वेळेत भरण्याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

लोडशेडींग मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न राज्याच्या राजकारणात अनेकदा दाखवलं जातं. परंतू सध्या राज्यावर पुन्हा एकदा लोडशेडींगचं संकट घोंगावत आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीच याबद्दलचे संकेत दिले आहेत. ते अकोल्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.

अकोला जिल्ह्यातील दोन विद्युत प्रकल्पांचं उद्घाटन नितीन राऊत यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलत असताना नितीन राऊत यांनी ग्राहकांना वीजबील वेळेत भरण्याची विनंती केली. वीजबील न भरलेल्या लोकांचं वीज कनेक्शन तोडण्यात येत यात काही नवीन नसल्याचंही राऊत म्हणाले. कारण ही शेवटी एक कंपनी आहे.

शेतकऱ्यांच्या वीजेसाठी राजु शेट्टींचं आंदोलन, सांगलीत महावितरणचं कार्यालय पेटवलं

राज्यात कोळशाची टंचाई असल्यामुळे जादा दराने कोळसा विकत घ्यावा लागतो आहे. यासाठी लागणारा पैसा जर वेळेत उपलब्ध झाला नाही तर राज्यात पुन्हा लोडशेडींग होऊ शकतं असंही नितीन राऊत म्हणाले.

हे वाचलं का?