Narayan Rane आणि शिवसेना या संघर्षापेक्षाही नाईक विरूद्ध राणे संघर्ष का होता चर्चेत?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे नारायण राणे. जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर महाराष्ट्रात राडा झाला. नारायण राणेंना अटकही झाली. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना विरूद्ध नारायण राणे असा संघर्ष पाहण्यास मिळाला. मात्र या संघर्षापेक्षा एक संघर्ष जास्त चर्चेत होता. काय होता तो संघर्ष? जाणून घेऊ. 2014 च्या […]
ADVERTISEMENT

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे नारायण राणे. जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर महाराष्ट्रात राडा झाला. नारायण राणेंना अटकही झाली. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेना विरूद्ध नारायण राणे असा संघर्ष पाहण्यास मिळाला. मात्र या संघर्षापेक्षा एक संघर्ष जास्त चर्चेत होता. काय होता तो संघर्ष? जाणून घेऊ.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला. आपल्या बालेकिल्ल्यात नारायण राणे यांना पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. हा पराभव केला होता वैभव नाईक यांनी. जेवढी चर्चा शिवसेना आणि नारायण राणेंच्या संघर्षाची झाली आहे तितकीच किंवा त्याहून जास्त चर्चा झाली आहे ते नाईक विरूद्ध राणे वादाची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा टोकाचा संघर्ष होता.
हा संघर्ष इतका टोकाचा होता की यावरून थेट नारायण राणेंवर खुनाचे आरोपही झाले. साधारणतः 1990 च्या काळात नारायण राणे आमदार होते. त्यानंतर कणकवलीतले एक युवा नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली. श्रीधर नाईक काँग्रेसचे नेते होते. त्या काळात नुकताच तिथे शिवसेनेचाही जम बसू लागला होता. कोकणात त्याआधी समाजवादी आणि काँग्रेस या पक्षांचा जोर होता. मात्र शिवसेना जशी वाढली तसा तिचा जोर कोकणातही वाढला.
श्रीधर नाईक यांची कणकवलीत झाली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याची चर्चा तेव्हा झाली होती. या खुनाची प्रचंड चर्चा त्यावेळी झाली होती कारण कोकणच्या भूमित असा प्रकार तोपर्यंत घडला नव्हता. पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली होती. राजकीय हत्येतून कोकणची लाल माती आणखी लाल झाली. यामध्ये आऱोपपत्र दाखल झालं ते 13 जणांच्या विरोधात. यातलं महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे नारायण राणे.










