‘या’ गावात धुळवड दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक का काढतात?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

son-in-law’s procession on a donkey : जावई म्हटलं की त्याचा खूप मानपान बघितला जातो. जावई (Son Inlaw) घरी येणार म्हटलं की पंचपक्वान्न बनवून त्याला खुश केलं जातं. जावई दुखावणार नाही याची भरपूर काळजी घेतली जाते. जावई रुसला म्हणजे पोरीला नीट नांदवणार नाही, अशी समज सासरकडच्या (Inlaws) लोकांची असते. म्हणून जावयाचे लाड पुरवले जातात. पण एक गाव असं आहे जिथे जावयाला शोधून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून चक्क त्याची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. (Why is the son-in-law’s procession on a donkey on Dhulivandana day in this village?)

100 वर्ष जुनी परंपरा

100 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. नेमकी ही प्रथा काय आहे, हेच आपण जाणून घेऊया. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या विडा गावात दर धुलिवंदनाला जावयाची रंगाची उधळण करून, वाजत गाजत गाढवावरून मिरवणूक काढली जाते. आता धुळवडी दिवशीच ही मिरवणूक का काढली जाते? त्या मागं 100 वर्षांपूर्वीचं इतिहास आहे.

ED: ‘जावयाला तरी त्रास द्यायला नको होता’, खडसे पुन्हा भाजपवर बरसले

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथून पडली प्रथा

सण 1915 साली याठिकाणी निजामाची राजवट होती. त्याकाळी विडा गावात जहागिरी होती. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे मेहुणे धुलीवंदनाला सासुरवाडीत आले होते. त्यावेळी परंपरेने भांग पिऊन थट्टा मस्करी सुरु झाली. मस्करीतून जावयाची गाढवावर बसवून सवारी काढण्यात आली. आणि बास्स तेंव्हापासून ही परंपरा सुरु झाली. मग ही परंपरा कायम ठेवण्यासाठी धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदर जावई शोध समिती नेमतात. एका जावयाला शोधून त्याला धुळवडीपर्यंत निगराणीखाली ठेवतात.

मिरवणूक संपल्यानंतर जावयाला दिला जातो मानपान

धुळवडी दिवशी ग्रामपंचायतीसमोर चपलेचा हार घालून गाढवावरून मिरवणुकीला सुरुवात होते. गावाच्या मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत मिरवणूक दुपारी मारुतीच्या देवळाजवळ थांबते. तिथे लोकवर्गणीतून जमा केलेल्या पैशातून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हाताने दिला जातो. सासऱ्याच्या ऐपतीप्रमाणे सोन्याची अंगठी भेट दिली जाते. एकीकडे गाढवावर बसून धिंड काढायची आणि त्यानंतर सोनं, कपडे देऊन मानसन्मान करायचा, असा भन्नाट प्रकार या गावात घडतो. विशेष म्हणजे कसलाही भांडण तंटा न होता ही प्रथा पार पडते. त्यात महत्वाचं म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होऊन ही परंपरा पार पाडतात.

ADVERTISEMENT

मॅक्सवेल भारताचा जावई, पाहा लग्नाचे अगदी खास फोटो

ADVERTISEMENT

200 जावई भूमिगत

गाढवाच्या मिरवणुकीपासून वाचण्यासाठी गावातील जावई आठवडाभरापूर्वी गावातून धूम ठोकतात. यंदा गावात स्थायिक असलेले 200 जावई भूमिगत झाल्याची माहिती मिळतेय. आता गायब झालेल्या जावयांना शोधण्यात शोध समितीला यश येतो का हे पहावं लागेल.

बीड : कोरोनामुळे ८० वर्षांची परंपरा खंडीत, जावयाची गाढवावरुन निघणारी मिरवणूक यंदा रद्द

    follow whatsapp

    ADVERTISEMENT