Abhijeet Bichukale पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; आता कुठून भरला अर्ज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Abhijeet Bichukle files nomination for kasba assembly by poll form pune

पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस आणि भाजपकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकिट दिलं आहे तर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंदू महासंघ, संभाजी ब्रिगेड असे पक्षांनीही इथून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तर काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली आहे. (Abhijeet Bichukale has contested elections from President to Lok Sabha and Legislative Assembly. However, they could not win any of these elections.)

याच उमेदवारांच्या भाऊगर्दीत आता बिग बॉस फेम आणि निवडणूक लढण्यासाठी ओळख मिळविलेले अभिजीत बिचुकले यांनीही उडी घेतली आहे. मंगळवारी त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदापासून ते लोकसभा आणि विधानसभेच्या विविध ठिकणांहुन निवडणुका लढविल्या आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही निवडणुकीत ते विजयी होऊ शकलेले नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Mumbai Airport अदानींकडे कसे गेले? राहुल गांधींनी सांगितली क्रॉनॉलॉजी

अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचकुले म्हणाले, मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोवर निवडणूक लढवायची, ही माझी भूमिका आहे. मी २ वर्षांपासून कसबा पेठेत राहतो. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. आता त्याचं भकास कसब्याला सजवायला मी येत आहे, असं उत्तर त्यांनी दिलं.

ADVERTISEMENT

अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील निवडणूक लढवली होती. त्यानंतर झालेली पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूकही लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना केवळं १३७ मतं पडली होती. अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठी-२ चे स्पर्धक म्हणूनही ओळखले जातात.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi Speech : अदाणींवरून मोदींना घेरलं! गांधींनी चढवला हल्ला

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अभिजीत बिचुकले हे सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण काही वर्षांपासून ते राजकारणात नशीब आजमावत आहेत. २००४ पासून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सातारा शहरात गुरुवार पेठ परिसरात त्यांचं घर आहे. २०१९चा मुख्यमंत्री मीच ठरवणार असंही या बॅनरवर लिहिलं होतं. तर त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,’ अशी विनंती केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT