Amravati : राणा-कडूंमध्ये मंत्रिपदासाठी चुरस; सत्ताधारी गटातील स्थानिक वाद चव्हाट्यावर
अमरावती : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 18 जणांचा समावेश झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 22 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच मंत्रिमंडळ विस्तारात अमरावतीमधून मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी सध्या आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यातूनच कडू आणि राणांमध्ये सातत्याने […]
ADVERTISEMENT

अमरावती : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 18 जणांचा समावेश झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 22 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. याच मंत्रिमंडळ विस्तारात अमरावतीमधून मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी सध्या आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
त्यातूनच कडू आणि राणांमध्ये सातत्याने वादाचे प्रसंग उभे राहत आहेत. नुकतेच अमरावतीच्या परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी केलेल्या टीकेला माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
ईडीचा मोर्चा आमदार रोहित पवारांकडे : ग्रीन एकर कंपनीच्या चौकशीचे आदेश
काय म्हणाले होते रवी राणा?
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमाला आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूवर सडकून टीका केली. मी गुहाटीला जाणारा आमदार नाही, मी देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा कार्यकर्ता आहे, सच्चा मित्र आहे. याशिवाय ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैय्या हे या मतदारसंघातील आमदारांचे घोषवाक्य आहे असे म्हणतं बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता.