RSS मुख्यालयाची सुरक्षा केंद्रीय यंत्रणा करणार : सरसंघचालक भागवत यांनाही Z+ कवच प्रदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्ली : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अभेद्य सुरक्षा कवच असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील काही काळात आलेल्या धमक्यांचा आणि सुरक्षा अहवालाचा अभ्यास करुन हा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी काही अधिकाऱ्यांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 150 जवानांनी सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली.

नागपूर येथील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी यापूर्वीच सीआयएसएफकडे आहे. त्यापूर्वी ही जबाबदारी राज्य राखीव पोलिस दल आणि नागपूर पोलिसांकडे होती. तसेच 2015 पासून सरसंघचालक मोहन भागवत यांनाही Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.

जून 2006 मध्ये लष्कर-ए-तैयब्बाच्या तीन दहशतवाद्यांना बंदुकीसह संघ मुख्यालयात प्रवेश करताना ताब्यात घेण्यात आले होते. याशिवाय मागील काळातही अनेकदा संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गतवर्षी देखील पोलिसांनी नागपूरमधील संघ मुख्यालयाची रेकी केल्याच्या संशयावरुन कश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. रहीस अहमद शेख असे त्याचे नाव होते. या दहशतवाद्याने डॉ. हेडगेवार स्मृति मंदिराची रेकी केली असल्याचीही माहिती पोलिस तपासातून उघड झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईसला जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर असलेल्या उमर याने नागपुरात पाठवले होते. श्रीनगरवरून मुंबई आणि मुंबईवरून नागपूर असा विमानप्रवास करुन रईस रेकी करण्यासाठी आला होता. केंद्रीय तपास यंत्रणेच्या हाती रईस लागला आणि त्यानेच नागपुरात रेकी केली असल्याची माहिती यंत्रणेला दिली होती. संशयितांनी नागपुरातील अनेक प्रसिद्ध परिसरांचे फोटो आणि व्हीडिओ तयार केले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT