Modi Government कडून राज्याला मोठा निधी; दहा प्रकल्पांना मिळणार चालना
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राच्या उर्जा विभागाला ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंअंर्तगत ‘५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज’ स्वरुपात हा निधी मंजूर झाला आहे. यातील अडीचशे कोटी राज्य शासनाला प्राप्त झाले असून हा निधी वितरीत करण्याचा शासन आदेशही गुरुवारी काढण्यात आला. राज्य सरकारने वीज वितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे […]
ADVERTISEMENT

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राच्या उर्जा विभागाला ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंअंर्तगत ‘५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज’ स्वरुपात हा निधी मंजूर झाला आहे. यातील अडीचशे कोटी राज्य शासनाला प्राप्त झाले असून हा निधी वितरीत करण्याचा शासन आदेशही गुरुवारी काढण्यात आला.
राज्य सरकारने वीज वितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे घेताना बुधवारी (४ जानेवारी) महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन कंपन्यांमध्ये पुढच्या तीन वर्षांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निधी महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, हा निधी कोणत्या प्रकल्पांसाठी खर्च करायचा याचा सविस्तर उल्लेखही या शासन निर्णयामध्ये करण्यात आला आहे.
काय म्हटलं आहे या आदेशामध्ये?
प्रस्तावना :