‘बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलीत’, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ramdas kadam criticize on uddhav Thackeray :मला कॉग्रेससोबत, सोनिया सोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळेस मी शिवसेना नावाचं दुकान बंद करेन, असे बाळासाहेबांनी सांगितलं होते. उद्धवजी तुम्ही काय केलंत? वडिलांच्या विचाराची बेईमानी केलीत,शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केलीत, अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (ramdas Kadam criticized uddhav thackeray for betraying balasaheb’s thoughts)

2009 मद्ये गुहागरमध्ये तिकीट दिलंत तिथे आपल्याच एका नेत्याला सांगुन मला पाडलंत, कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायच होतं म्हणून असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. उद्धव ठाकरे गुपचूप बघत असतील हा रामदास कदम काय बोलतोय, असे देखील रामदास कदम म्हणाले.

उद्धवजी तुम्ही काय केलंत, वडिलांच्या विचाराची बेईमानी केलीत. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केलीत,अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच हा कोकण एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, असे देखील कदम म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT