प्रकाश आंबेडकरांसाठी डाव टाकला, पण उद्धव ठाकरेंचे पत्ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात

मुंबई तक

‘देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू, तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही.’ प्रकाश आंबेडकरांसमोर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानांची महाराष्ट्रात खूप चर्चा होतेय. ठाकरेंनी आंबेडकरांना शिवशक्ती-भीमशक्ती युतीसाठी खुली ऑफर दिल्याचं या विधानावरून म्हटलं जातंय. पण शिवशक्ती, भीमशक्ती युतीसाठी ठाकरेंनी डाव टाकला असला तरी त्याचे पत्ते मात्र त्यांच्या हातात नाहीत. काँग्रेस, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘देश गुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू, तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही.’ प्रकाश आंबेडकरांसमोर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानांची महाराष्ट्रात खूप चर्चा होतेय. ठाकरेंनी आंबेडकरांना शिवशक्ती-भीमशक्ती युतीसाठी खुली ऑफर दिल्याचं या विधानावरून म्हटलं जातंय. पण शिवशक्ती, भीमशक्ती युतीसाठी ठाकरेंनी डाव टाकला असला तरी त्याचे पत्ते मात्र त्यांच्या हातात नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हातात पत्ते आहेत.

ठाकरेंना आंबेडकर सोबत का हवेत, शिवशक्ती-भीमशक्ती युतीचा डाव काय आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हातात नेमके कोणते पत्ते आहेत, त्यावरच आपण नजर टाकणार आहोत.

आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीत बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी अतुलनीय असं योगदान दिलं. जात, धर्मव्यवस्थेविरोधात लढताना दोघांच्या भूमिका एकमेकांना पूरक राहिल्या. नंतर आंबेडकर, ठाकरेंचे वारसदारही राजकारणात उतरले. पण त्यांच्या भूमिका दोन टोकावर असायच्या. याच पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२२ ला प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिन महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक गोष्ट घडली.

बाबासाहेब आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरेंचे पणतू एका मंचावर आले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसले. एकमेकांच्या सुरात सूर मिसळत बोलले. ठाकरे तर निव्वळ बोललेच नाही, तर एकत्र काम करण्याची भावनाही उघडपणे बोलून दाखवली.

हे वाचलं का?

    follow whatsapp