Women T20 World cup : भारत आणि ऑस्ट्रेलियात फायनलसाठी लढत; कोण मारणार बाजी? - Mumbai Tak - india vs australia in semi finals who will win the match - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

Women T20 World cup : भारत आणि ऑस्ट्रेलियात फायनलसाठी लढत; कोण मारणार बाजी?

Ind vs aus semifinal : ICC महिला T20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia semifinal match) यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. (Indian team in B group) भारतीय संघाने ब गटात दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर (Australian team in […]

Ind vs aus semifinal : ICC महिला T20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia semifinal match) यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. (Indian team in B group) भारतीय संघाने ब गटात दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर (Australian team in A group ) ऑस्ट्रेलियाने ‘अ’ गटातील त्यांचे सर्व सामने जिंकले. Who will win the match Between India vs Australia?

महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना

उपांत्य फेरीच्या सामन्यात केपटाऊनमधील हवामानाकडेही चाहत्यांची नजर असेल. तुम्हाला आठवत असेल की भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा पाऊस पडला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार निर्णय झाला. यावेळी चांगली गोष्ट म्हणजे हवामान अहवालानुसार, केपटाऊनमध्ये पावसाची फारशी शक्यता नाही. क्रिकेटसाठी योग्य परिस्थिती असून संपूर्ण खेळ होण्याची शक्यता आहे.

सामना पावसामुळे रद्द झाल्यास हा निर्णय होईल

या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला आणि निकाल मिळविण्यासाठी किमान षटके टाकली गेली नाहीत, तर काळजी करण्याचं कारण नाही. खरे तर आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे 23 फेब्रुवारीला सामना होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारीला सामना जिथे थांबला होता तिथून सुरू होईल.

राखीव दिवशीही निर्णय झाला नाही तर

दोन्ही दिवशी अजिबात सामना झाला नाही. म्हणजेच नाणेफेक न करता किंवा एकही षटक न खेळता पावसामुळे सामना रद्द झाला, तर गट टप्प्यातील गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचेल कारण ते आपल्या गट-अ मध्ये अव्वल स्थानावर आहे.

Womens T20 World Cup: रोहित शर्माला मागे टाकत, ‘या’ महिला क्रिकेटरने रचला विक्रम!

येथील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल राहते न्यूलँड्स क्रिकेट मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. अशा परिस्थितीत या ब्लॉकबस्टर सामन्यात दोन्ही बाजूंच्या वेगवान गोलंदाजांची मोठी भूमिका असेल. यासोबतच फलंदाजांनाही या विकेटवर स्वत:ला सांभाळून खेळावे लागेल आणि सुरुवातीच्या स्पेलमध्ये बाद होण्याचे टाळावे लागेल. एकदा फलंदाज सेट झाल्यानंतर ते मुक्तपणे धावा करू शकतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतासाठी सोपा असणार नाही. टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त सात जिंकले आहेत. आणि ऑस्ट्रेलियाने 22 सामन्यांत विजय मिळवला. भारताचा ऑस्ट्रेलियावर शेवटचा विजय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता जेव्हा त्यांनी सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता.

दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू -11 भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर.

ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (सी), बेथ मुनी, अलिसा हिली, अलिसा पेरी, ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, एलाना किंग, मेगन शुट, डी’आर्सी ब्राउन.

‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट!