T20 World Cup : पाकिस्तानच्या धडाकेबाज कामगिरीचा भारतालाही फायदा, उपांत्य फेरीसाठी ‘असं’ आहे समीकरण
टी-२० वर्ल्डपमध्ये भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे हा गट ग्रूप ऑफ डेथ म्हणून ओळखला जात आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारत आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करुन उपांत्य फेरीतलं आपलं स्थान जवळपास निश्चीत केलंय. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाची पुढची वाट खडतर झालेली असली तरीही पाकिस्तानने […]
ADVERTISEMENT

टी-२० वर्ल्डपमध्ये भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे हा गट ग्रूप ऑफ डेथ म्हणून ओळखला जात आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारत आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करुन उपांत्य फेरीतलं आपलं स्थान जवळपास निश्चीत केलंय.
पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाची पुढची वाट खडतर झालेली असली तरीही पाकिस्तानने न्यूझीलंडवर मात करत भारतासमोरचं आव्हान आता काही प्रमाणात सोपं करुन ठेवलं आहे.
BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !
उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर भारताला ३१ तारखेला होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताला पुढील तीन सामन्यांमध्ये तुलनेने सोपं आव्हान असणार आहे. भारताने शेवटचे ३ सामना अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघांविरुद्ध होणार आहेत.










