Navpancham Rajyog 2026 : ज्योतिष शास्त्रात असे काही विशेष योग असतात ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात मोठे बदल होतात. असे योग हे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील समृद्धीचे आणि यशाचे संकेत देत असताता. 2026 मध्ये असाच एक महत्त्वपूर्ण योग तयार होत आहे. हा योग म्हणजे 'नवपंचम राजयोग.' वैदिक ज्योतिषानुसार, गुरु बृहस्पतीला सर्वात शुभ आणि प्रभावशाली ग्रह मानले जाते. सामान्यतः गुरु एका राशीत सुमारे एक वर्ष राहतात, पण 2025 मध्ये मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर त्यांची गती विलक्षण वेगवान राहिली आहे. याच कारणामुळे या काळात ते दोन ते तीन वेळा राशी परिवर्तन करतील.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' विभागांत तापमानात वाढ होण्याची शक्यता, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट
सध्या गुरु मिथुन राशीत विराजमान आहेत. यादरम्यान त्यांचे विविध ग्रहांसोबत युती आणि दृष्टी संबंध तयार होत राहतील. विशेष म्हणजे, या काळात गुरु आणि शुक्र यांच्यात एक महत्त्वपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने थेट नवपंचम राजयोग तयार होत आहे. हा संयोग विशिष्ट राशींच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या योगाच्या प्रभावामुळे केवळ व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळणार नाही, तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदही येईल. दृक पंचांगानुसार, 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:29 वाजता गुरु आणि शुक्र एकमेकांपासून 120 अंशांवर असतील. यावेळी शुक्र कुंभ राशीत आणि गुरु मिथुन राशीत असल्याने या राजयोगाचा प्रभाव सुरू झाला आहे.
'या' राशींना होणार विशेष लाभ
मीन रास : मीन राशीच्या जातकांसाठी हा योग वरदान ठरेल. या योगाच्या प्रभावामुळे मीन राशीचे लोक जुन्या त्रासांतून मुक्त होतील. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा जाणवेल. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच कुटुंब आणि घराशी संबंधित बाबींमध्ये संतुलन आणि सुख-शांती राहील.
कर्क रास : कर्क राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग विशेष फलदायी असेल. या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीतून आणि व्यवसायातून वेगाने नफा मिळेल. नवीन करिअर संधी आणि महत्त्वाच्या सामाजिक संपर्कांचा फायदा होईल. जीवनात सकारात्मक बदल घडतील आणि मानसिक शांतता लाभेल.
कुंभ रास : कुंभ राशीच्या लग्न भावात मंगळ आणि पाचव्या भावात गुरु विराजमान आहेत. या योगाच्या प्रभावामुळे कुंभ राशीचे जातक आपल्या करिअरमध्ये उच्च पद प्राप्त करू शकतात. व्यवसायात लाभ आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित होईल. तसेच वैयक्तिक आयुष्यात ताळमेळ आणि आनंद टिकून राहील.
ADVERTISEMENT











