'या' 5 पापांमुळे मनुष्याचा होईल अकाली मृत्यू, गरुड पुराणात उल्लेख

Garuda Purana : गरुड पुराणास हिंदू धर्मात एक विशेष स्थान दिले गेले आहे. याच गरुड पुराणात विशिष्ट पापांचा उल्लेख नमूद करण्यात आला आहे, यामुळे व्यक्तीचे आयुष्य कमी होऊ शकते, तसेच आकाली मृत्यू देखील होऊ शकतो. 

Garuda Purana

Garuda Purana

मुंबई तक

03 Feb 2026 (अपडेटेड: 03 Feb 2026, 10:35 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गरुड पुराणात अकाली मृत्यू येण्यामागची कारणं

point

मांस खाणे देखील सांगितलं पाप

Garuda Purana : गरुड पुराणास हिंदू धर्मात एक विशेष स्थान दिले गेले आहे. एक धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांबद्दल ज्ञानाचा स्त्रोत देखील आहे. गरुड पुराणात, भगवान विष्णू सांगतात की, जीवनात केलेली कामं आणि पाप वर्तमानाच नव्हे तर जन्म आणि मृत्यूच्या चक्रावर देखील खोलवर परिणाम करतात. गरुड पुराणात विशिष्ट पापांचा उल्लेख नमूद करण्यात आला आहे, यामुळे व्यक्तीचे आयुष्य कमी होऊ शकते, तसेच आकाली मृत्यू देखील होऊ शकतो. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :  लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत उडी मारत तरुणीनं संपवलं जीवन, कारण आलं समोर

गरुड पुराणात अकाली मृत्यू येण्यामागची कारणं

गरुड पुराणात अकाली मृत्यू येण्यामागचं पहिलं कारण म्हणजे ब्राह्मनांचा अनादर करणे. त्यांच्याविरुद्ध हिंसाचार करणे असे धार्मिक शास्त्रांमध्ये म्हटलं आहे. ब्राह्मनांचा अनादर केल्याने केवळ शिस्तीचे उल्लंघन होत नाही तर व्यक्तीच्या आत्म्यावरही त्याचा परिणाम होतो. 

दुसरे गंभीर पाप म्हणजे आपल्याच पालकांचा, शिक्षकांचा आणि देवांचा अनादर करणे. आपण आपल्या पालकांचा, शिक्षकांचा आणि देवाचा जितका आदर आणि कृतज्ञता दाखवू तितके आपले जीवन चांगले आणि आनंदी होईल. 

हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांची नोकरीत होणार बढती, तर काही लोकांना पैशांचा लाभ होणार, काय सांगतं राशीभविष्य?

दुसऱ्या स्त्रीशी व्यभिचार करणे, खोटे बोलणे, चोरी करणे, प्राण्यांना मारणे आणि मांस खाणे देखील पाप आहे, व्यक्तीला आध्यात्मिक अंधारात बुडवू शकतात. 

    follow whatsapp