घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, दोन चिमुकल्यांनीही गमावला जीव

मुंबई तक

12 Aug 2026 (अपडेटेड: 12 Aug 2026, 12:52 PM)

ghatkopar landslide garib nagar chawl : घाटकोपर पश्चिमेतील गरीब नगर चाळीवर मध्यरात्री दरड कोसळून 7 ते 8 झोपड्या दबल्या. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

ghatkopar landslide garib nagar chawl

ghatkopar landslide garib nagar chawl

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू

point

दोन चिमुकल्यांनीही गमावला जीव

ghatkopar landslide garib nagar chawl  : मुंबईतील घाटकोपर पश्चिमेला असलेल्या गरीब नगर चाळीवर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. मध्यरात्री अचानक दरड कोसळल्याने परिसरातील नागरिकांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत 7 ते 8 झोपड्या दरडीखाली दबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरडीखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : ब्रम्हकुमारी सेंटरमधील महिला, तरुणाचं एकतर्फी प्रेम; अन् आश्रम मालकाची हत्या

सहा जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी 

या दुर्घटनेत एकूण 10 जण बाधित झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. यामध्ये चार जण जखमी असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कुर्ला भाभा रुग्णालयाचे डॉक्टर वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 18 वर्षीय सोहेल अन्सारी याला डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच 14 वर्षीय मोहम्मद अन्सारी, 28 वर्षीय नईमुद्दीन इक्बाल खान आणि 16 वर्षीय साजिद अन्सारी यांचा समावेश आहे. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : Personal Finance: 50,000 रुपये पगारात मुंबईत घर घेता येईल का? समजून घ्या पूर्ण गणित!

राजावाडी रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. शीतल राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, या सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये 14 वर्षीय मोहम्मद समीर अन्सारी, 19 वर्षीय साहिल हुसेन अब्दुल काझी, 45 वर्षीय अनोळखी व्यक्ती, 2 वर्षीय अबान आरिफ शेख, 4 वर्षीय मनत आरिफ शेख आणि 27 वर्षीय मरजिना आरिफ शेख यांचा समावेश आहे.

 दबलेल्या झोपड्यांमध्ये नागरिक अडकले

दरड कोसळल्यानंतर दबलेल्या झोपड्यांमध्ये नागरिक अडकले असल्याने त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील एकूण बाधितांची संख्या 10 असून त्यापैकी चार जण जखमी आणि सहा जण मृत आहेत. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेमुळे गरीब नगर चाळीत मोठी दुर्घटना घडली.