मुंबई : मुंबईच्या हाजी अलीजवळील लोटस जेट्टी परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. 5:40 वाजण्याच्या सुमारास अस्थि विसर्जनासाठी आलेल्या कुटुंबासोबत एक दुखद दुर्घटनेत दोन जणांचा डूबून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यूज एजेंसीच्या वृत्तानुसार, संतोष विश्वेश्वर (51), कुणाल कोकाटे (45) आणि संजय सर्वांकर (58) हे तिघे एका दिवंगत नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी वरळी येथील समुद्रकिनारी आले होते. अस्थि विसर्जनाची धार्मिक प्रक्रिया पूर्ण करत असताना समुद्रात अचानक उसळलेल्या तीव्र लाटांमुळे त्यांचा तोल गेला आणि ते तिघेही खोल पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. काही वेळातच तिघांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आणि त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> एक दोन नाही, 16 जिवंत साप प्रवाशाचे बॅगेत सापडले आणि मुंबई विमानतळावरच्या आख्ख्या यंत्रणा हादरल्या
रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी संतोष विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे यांना मृत घोषित केले. तिसरे व्यक्ती संजय सर्वांकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात सायंकाळच्या वेळी अचानक लाटांचा वेग वाढला आणि तीव्र लाटांनी तिघांना आत ओढलं. अस्थि विसर्जनासाठी समुद्रकिनारी खोल पाण्यापर्यंत जाण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या प्रवाहात अडकले. स्थानिक मच्छिमारांनी धैर्य दाखवत तातडीने पाण्यात उडी घेतली आणि पोलिसांच्या मदतीने तिघांना बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा >> झाडाला लटकलेला, सडलेल्या अवस्थेत सापडला नेपाळी युवकाचा मृतदेह, सिंधुदुर्ग हादरलं, घटना काय?
वरळी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. लोटस जेट्टी परिसरात अस्थि विसर्जनादरम्यान सुरक्षा उपायांचे पालन झालं होतं का, याची चौकशी सुरू आहे. समुद्रकिनारी अशा धार्मिक विधींसाठी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
ADVERTISEMENT
