तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली; आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

Belagaon Crime : तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली; आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

Belagaon Crime

Belagaon Crime

मुंबई तक

26 Nov 2025 (अपडेटेड: 26 Nov 2025, 10:49 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली

point

आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

Belagaon Crime : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलंगी गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका आईने तीन दिवसांच्या नवजात मुलीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला यापूर्वी तीन मुली असून यावेळी मुलगा जन्माला यावा, अशी तिची तीव्र इच्छा होती. मुलगी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतापाच्या भरात तिने हे क्रूर पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

आधीपासून तीन मुली असल्यामुळे कुटुंबात मुलगा हवा, आईची अपेक्षा

अधिकची माहिती अशी की, रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलंगी गावातील अश्विनी हळकट्टी (वय 28) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तिला आधीपासून तीन मुली असल्यामुळे कुटुंबात मुलगा हवा, अशी अपेक्षा होती. 23 नोव्हेंबर रोजी मुदकवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती पार पडली. प्रसूतीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी ती आपल्या माहेरी, हिरेमुलंगी येथे परतली होती.

हेही वाचा : मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात! ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली अन्... तरुणासोबत घडलं भयानक

घटनेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी घरातील इतर सर्व जण बाहेर गेले होते. त्या वेळी अश्विनीने एकटीच असताना आपल्या नवजात बालिकेचा गळा दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने कुटुंबीयांना "बाळ श्वास घेत नाही" असे सांगून संशय दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात आली.

दरम्यान, बाळाला तात्काळ रामदुर्ग येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता बाळाचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले. नवजात बालिकेच्या गळ्यावर दाबाचे स्पष्ट चिन्ह असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अश्विनी हळकट्टी हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता स्थानिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. समाजमनाला हादरवून टाकणारी ही घटना पुन्हा एकदा मुलगा-मुलगी भेदभावाच्या मानसिकतेचे भयाण चित्र समोर आणते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अमरावती : लग्न लागलं अन् दोन तासात नवरदेवाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबियांना सावरणेही झाले कठीण

    follow whatsapp