Dombivali Blast : डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू, 25 ते 30 कामगार गंभीर जखमी

मिथिलेश गुप्ता

23 May 2024 (अपडेटेड: 23 May 2024, 10:07 PM)

Dombivali MIDC Blast : एमआयडीसीच्या फेज 2 मधील अमोधन नावाच्या केमिकल कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट इतका भयानक होता, सर्वत्र आगीचे लोण पसरले आहे. या स्फोटाच्या आणि आगीच्या झळा आजूबाजूच्या कंपन्या आणि कामगारांना बसला आहे.

dombivali chemical company midc blast boiler blast shockinh story dombivali

डोंबिवलीच्या एमआयडीसीत बॉयलरचा भीषण स्फोट

follow google news

Dombivali MIDC Blast : डोंबिवलीच्या एमआयडीसीत भीषण स्फोटाची घडना घडली आहे. या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 64 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमी कामगारांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, कंपनीच्या नजीकच्या अनेक इमारतीच्या काचा फुटल्या आहेत आणि परिसरात काळ्याकुट्ट धुरांचे लोण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. (dombivali chemical company midc blast boiler blast shocking story dombivali) 

हे वाचलं का?

डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान या हार्डनर बनवणाऱ्या कंपनीतील रिॲक्टरचा आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की त्यामुळे शेजारील कंपन्या, दुकाने आणि रहिवासी इमारतीचे मोठे नुकसान झाले. शेजारील कंपन्यांमध्ये आग पसरून तर स्फोटामुळे अनेक दुकानांच्या आणि रहिवासी इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाही.

हे ही वाचा : Maharashtra News : यमाची पडली वक्रदृष्टी; महाराष्ट्रात 20 जणांचा बुडून मृत्यू!

आजचा स्फोट हा साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. तर त्यापेक्षा लांब दूरवरून या स्फोटानंतर लागलेल्या आगीचे - धुराचे लोळ आकाशात उठल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्यामध्ये आतापर्यंत आगीमध्ये जळालेल्या 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तर केडीएमसी अग्निशमन दलासोबतच एनडीआरएफची एक टीम आणि औद्योगीक सुरक्षा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

जखमींची नावे 

प्रतिक वाघमारे 
राजन गोठणकर (वय 56)
बबन देवकर (वय 45)
रुद्यांश दळवी (वय 51)
प्रवीण चव्हाण (वय 41)
मधूरा कुलकर्णी (वय 37)
हेमांगी चौक (वय 56)
किशोर विचपूते (वय 54)
अक्षता पाटील (वय 24) 

या जखमींना नेपच्यून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहेत. 

हे ही वाचा : PN Patil : निष्ठावंत हरपला! काँग्रेसचे आमदार पाटील यांचे उपचारादरम्यान निधन

 

नुकसान भरपाई मिळणार 

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना खा.डॉ. शिंदे यांनी सांगितले की डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याची मागणी याआधी झालेल्या अशाच प्रकारच्या घटनांनंतर केली जात आहे. त्यावर आता राज्य शासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल. इथल्या केमिकल कंपन्यांचे एबीसी असे वर्गीकरण करून त्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्यात याव्यात. मात्र या कंपन्या स्थलांतरित करताना कोणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही याचा नक्कीच विचार केला जाईल असेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून यातील नुकसानग्रस्तांचे एक आठवड्याच्या आत पंचनामे करण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्यधिकाऱ्यांना दिले असून त्यानंतर तातडीने नुकसान भरपाई दिली जाईल असेही खा.डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले

कंपनीने बॉयलरची नोंदणीच केली नाही 

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीने बॉयलरची नोंदणीच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबतची माहिती बाष्पके चालनालय,संचालक, धवल अंतापूरकर यांनी दिली आहे. 

सदर कारखान्यामध्ये कोणत्याही बाष्पकाची (बॉयलरची) नोंदणी भारतीय बाष्पके विनियम, १९५० अंतर्गत या विभागाद्वारे करण्यात आलेली नाही. सदर कारखान्यात कोणताही नोंदणीकृत बाष्पक कार्यरत नव्हता.कारखान्यातील स्फोटाच्या कारणांबाबतची माहिती सखोल चौकशी अंती देण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. 

मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत 

डोंबिवली स्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवलीतील स्फोटाची घटना ही दुदैवी आहे. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना या स्फोटातून बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखाची मदत दिली जाणार आहे. 

तसेच या कॅम्पसमधील अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. लोकांच्या जीवनाशी तडजोड केली जाणार नाही आणि घटनेची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 
 

    follow whatsapp