Maharashtra Weather: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पाऊस धडकणार, हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

Maharashtra Weather Update : 4 जून रोजी मुंबईतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 जून रोजी हवामान खात्याने पावासाचा अंदाज वर्तवला आहे, त्याची महिती जाणून घेऊयात. 

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

मुंबई तक

05 Jun 2025 (अपडेटेड: 05 Jun 2025, 10:50 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

5 जून रोजी हवामान खात्याकडून पावासाचा अंदाज

point

'या' ठिकाणी सावधानतेचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून कहर करणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी मुंबईतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 जून रोजी हवामान खात्याने पावासाचा अंदाज वर्तवला आहे, त्याची महिती जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

राज्यात मान्सून दाखल होऊन काही दिवस झाले आहेत. 30 मे नंतर मान्सूनचा काहीसा जोर कमी झाला आहे. तसेच 4 जूनपर्यंत पावसाची तीव्रता आणखी कमी असण्याची शक्यता हवमान खात्याने दिली. 

हेही वाचा : पुण्यातील शिक्षकाने पेपर सोडवायला रात्री बोलावलं, काही तरी भलतंच...

महाराष्ट्रातील हवामान खात्याचा अंदाज

कोकण भागातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे आणि घाटमाथ्यावर काही भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस धिंगाण घालणार आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात 4 जून रोजी ढगाळ वातावरण होते. दरम्यान ५ जून रोजी मुंबईकरांनी समुद्राकिनारी जाताना सावधगिरी बाळगावी. मुंबई, धुळे, ठाणे, नागपूर, सातारा, अहिल्यानगर या भागांना येलो अलर्ट जारी केला आहे.

मध्य महाराष्ट्र हवामान अंदाज

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. परंतु काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस राहणार आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तापमान 33-35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील हवामान अंदाज

मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी असून कोरडे हवामान असणार आहे.  तापमान 34-36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये काही ठिकाणी पावसाचे प्रमाण असणार आहे. तर हवामान कोरडे राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. 

विदर्भातील हवामान अंदाज

विदर्भात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम हा विदर्भाच्या हवामानावर होईल. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. 35-37 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता असणार आहे. तसेच ढगाळ वातावरणाची नोंद हवामान खात्याने वर्तवली आहे. 

हेही वाचा : भर रस्त्यात तरूण-तरूणीचा सुरू होता अश्लील कांड, Video आला समोर..

दरम्यान, या मान्सून परिस्थितीत हवामान विभागाने प्रमुख्याने शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी 12 जूननंतर शेतात पेरणी करावी. तसेच कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी समुद्रकिनारी जाण्याचा हट्ट धरु नये. लाटांची उंची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये पावसामुळे वाहतूक विस्कळीत होईल त्यासाठी सावधगिरी बाळगावी. 

    follow whatsapp