साताऱ्यातील जवानाचा संशयास्पद मृत्यू, पंजाबमधील सैन्य तळावर नेमकं काय घडलं?

इम्तियाज मुजावर

• 12:46 PM • 14 Apr 2023

पंजाबमधील सैन्य तळावर झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील जवानाचा मृत्यू हा दहशतवादी हल्ल्यातील नसून आपआपसातील कलहामुळे झाल्याचं सध्या बोललं जात आहे. याबाबत लष्कराकडून उच्चस्तरीय चौकशी देखील केली जात आहे.

suspicious death of a jawan in satara in firing at an army base in punjab

suspicious death of a jawan in satara in firing at an army base in punjab

follow google news

सातारा: पंजाबच्या भठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर (Army Base) 12 एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला. यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले. यातच साताऱ्यातील (Satara) जावळी तालुक्यामधील करंदोशी येथील जवान तेजस मानकर याचा या गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना केलेल्या मेलनुसार जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी दुपार पर्यंत त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. (suspicious death of a jawan in satara in firing at an army base in punjab)

हे वाचलं का?

वृत्तसंस्था मधील प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार सैन्य दलातील परस्परातील मतभेदामुळे गोळीबार झाल्याचा पंजाब पोलिसांचा व सैन्य दलातील पोलिसांचा संशय आहे.

नेमकं प्रकरण काय?

एशियन न्यूज वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संबंधित गोळीबार हा दहशतवादी घटना नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेवर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने निगराणी केली जात आहे.

अधिक वाचा- Pune: मुलीने दिलेल्या नकारामुळे नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, पुण्यात नेमकं काय घडतंय?

याप्रकरणी काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सैन्य तळावर बाहेरून आलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. परस्परांमधील मतभेदामुळे जवान मरण पावले असल्याचे काही वृत्तामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संबंधित गोळीबाराच्या या घटनेत चार जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये संशयास्पद मृत्यू जावळी तालुक्यातील तेजस मानकर या जवानाचा झाला असून राज्य पोलीस त्याचबरोबर कृती दलाचे लष्करी अधिकारी घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले व त्यांनी घटनास्थळावरून संबंधित माहिती घेतली असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक एडीजी सुरेंद्र पाल सिंह परमार यांनी कोणताही दहशतवादी हल्ला नसल्याचं म्हटलं आहे .

अधिक वाचा- ओठांचं चुंबन, जीभही… दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडीओने खळबळ

याबाबत सैन्य दलातील अंतर्गत कलहामुळे सदर घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. बेछूट गोळीबार करणारा सिव्हीलीयन ड्रेसमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

Ani ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित गोळीबाराच्या अनुषंगाने दोन दिवस आधीच युनिट गार्डरूम मधून एक रायफल व 28 काडतुसे गायब झाली होती. त्यामुळे पंजाब पोलिसांच्या सूत्रानुसार संबंधित घटनेमध्ये सैन्य दलातील काही जवानांचा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे व तपास सुरू आहे

गतवर्षी बामनोली तर्फ कुडाळ तालुका जावळी येथील जवान प्रथमेश पवार याचाही मृत्यू सैन्य दलातील अंतर्गत कलहामुळे झाला होता. त्या जवानाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक देखील केली आहे. जवानाचा मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना त्याने आत्महत्या केली असल्याची सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या वडिलांनी प्रथमेश पवार यांच्या मृत्यूचे गूढ स्वतः तपास करत संबंधित यंत्रणेला त्याची आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचे समोर आणून दिले होते.

अधिक वाचा- गौतमी पाटील आली, पण डान्स न करताच निघून गेली; शेवटी चाहत्यांना…

या प्रकरणी सैन्य दलातीलच एका जवानाला अटक करण्यात आली होती. तसाच हा देखील प्रकार असल्याने जावळी तालुक्यातील जवान तेजस मानकरलाही कलहाचा बळी ठरला असल्याचं बोललं जात आहे. याबाबत जावळी तालुक्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

कोण आहे तेजस मानकर?

जवान तेजस यांच्या घराला सैन्याची परंपरा असून त्यांचे वडील माजी सुभेदार आहेत. तर भाऊ सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते ही सैन्य दलात आहेत. तेजसचे प्राथमिक शिक्षण करंदोशी येथे झाले असून माध्यमिक शिक्षण त्यांनी वडिलांबरोबर मिलिटरी कॅम्प मध्ये पूर्ण केले होते.

अधिक वाचा- विकृतीचा कळस! अंध महिलेवर पतीसमोरच लैंगिक अत्याचार

दोन वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले असून नुकतेच पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची पंजाब या ठिकाणी नियुक्ती करण्यात झाली होती. लहानपणापासूनच घरामध्ये सैनिकी वातावरणामुळे त्याच्यावरही चांगला प्रभाव होता. सैन्य दलामध्ये भरती होण्याचा त्याने निश्चय केला होता. नुकतेच सहा महिन्यापूर्वी तो आपले प्रशिक्षण पूर्ण करून पंजाब प्रांतात देशसेवेसाठी रुजू झाला होता. दरम्यान आता जी घटना घडली आहे त्यामुळे तालुक्यासह करंदोशी गावावर शोककळा पसरली आहे. तेजसच्या पश्चात आई मनीषा, वडील लहुराज, भाऊ मेजर ओंकार असा परिवार आहे.

    follow whatsapp