Baramati : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर

भागवत हिरेकर

19 Mar 2024 (अपडेटेड: 19 Mar 2024, 04:15 PM)

Shrinivas Pawar Ajit Pawar News : श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आता एक पत्र बारामतीमध्ये व्हायरल होत आहे.

अजित पवारांविरोधात आता श्रीनिवास पवार यांनी भूमिका घेतली आहे.

श्रीनिवास पवारांना बारामतीकराचे पत्र, काय दिले उत्तर?

follow google news

Shrinivas Pawar Ajit Pawar Baramati Lok Sabha 2024 : शरद पवारांविरोधात बंड केल्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळे विरुद्ध पत्नी सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. त्यावरून श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर चांगलंच सुनावलं. त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर आता एक पत्र बारामतीत व्हायरल झालं आहे. या पत्रातून श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे वाचा?

हे वाचलं का?

बारामतीत व्हायरल झालेले पत्र

सुज्ञ बारामतीकरांचे मत

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी-खोटा सहानुभूतीदार

श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला... पण हा शब्द वापरत असताना आपण सोईस्करपणे का विसरला आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले. एका बाजूला समजाप्रती आपण काय तरी देणं लागतो ह्याकडे डोळेझाक करून दुसरीकडे मात्र केवळ अजितदादांचे छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले.

वास्तविक पाहता कुठलीही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपल्या व्यवसायामध्ये स्वकर्तृत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटवते. अजितदादांकडे पाहिले तर सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात. जनतेमध्ये मिसळतात, त्यांची कामे मार्गी लावतात. हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली आहे.

हेही वाचा >> बारामतीत जाऊन अजित पवारांना नालायक म्हणणारे 'श्रीनिवास पवार' आहेत तरी कोण?

बापू, तुम्ही बोलताना म्हणाला की मलापण पवार साहेबांच्यासारखे काका मिळाले पाहिजे होते, पण तुम्ही हे विसरला की फक्त काका मिळून चालत नाही तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात.

पण, आज अचानक सपत्नीक पुढे येऊन अजितदादांबद्दल जे मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे, अशी शंका उपस्थित होते; कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्याबरोबर दिसला होता.

बारामतीकर म्हणून असे वाटते की, तुम्ही एकतर अजितदादांना कायम व्हिलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाले असावे किंवा आपल्या बायको-पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्त्वकांक्षापोटी आपण हे पाऊल टाकले असावे.

हेही वाचा >> "याच्यासारखा नालायक माणूस नाही", अजित पवारांवर सख्खा भाऊच संतापला

शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की आम्ही घोगडं भिजवत ठेवणाऱ्या, खोटी सहानुभूतीदार लोकांच्या मागे उभे न राहता प्रत्यक्षात विकास करणाऱ्या विकासपुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.

....आणि श्रीनिवासबापू आमचं ठरलंय "घड्याळ तेच वेळ नवी"

    follow whatsapp