पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दिल्या गुंगीच्या गोळ्या, निर्जनस्थळी नेलं अन् सपासप वार करत संपवलं, कारण ऐकून हादरून जाल

Crime News : पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीला एका निर्जनस्थळी नेलं आणि बेदम मारहाण करत खून केला. पत्नीला आपल्या पतीकडून एक दोन नाहीतर तब्बल अठरा एकर जमीन हडप करायची होती असा यामागचा मुख्य हेतू होता. 

crime news

crime news

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 06:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेकडून जबलपूरमध्ये मोठा कांड

point

प्रियकराच्या मदतीने पतीला निर्जनस्थळी नेलं आणि केली हत्या

crime news : जबलपूरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर पार पडलेल्या विधीनंतर पत्नीनं आपल्या पतीची हत्या करत मोठं कांड केलंय. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीला एका निर्जनस्थळी नेलं आणि बेदम मारहाण करत खून केला. तरुणीने संबंधित व्यक्तीकडून पतीकडून एक दोन नाहीतर तब्बल अठरा एकर जमीन हडप करायची होती असा यामागचा मुख्य हेतू होता. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला टोळक्यांकडून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण

पतीचं नाव इंद्र कुमार तर पत्नीचं नाव खुशी तिवारी अशी त्यांची ओळख समोर आली. पतीकडून तब्बल अठरा एकर जमीन हडप करण्यासाठी इंद्र कुमारी नावाच्या महिलेनं पतीवर चाकूने वार करत संपवलं. हनिमूनपूर्वी पत्नीनं आपल्या पतीच्या जेवनात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तो त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला होता. तेव्हा खुशी तिवारी, तिचा प्रियकर आणि ड्रायव्हर शमसुद्दीनसह त्याला गाडीत टाकून निर्जनस्थळी नेलं. तेव्हा त्याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह झुडपात टाकण्यात आला. 

'असा' रचला हत्येचा कट

इंद्र कुमारच्या लग्नाचं वय निघून गेलं होतं. त्याच्याकडे तब्बल अठरा एकर जमीन होती. मात्र, जीवनसाथी नसल्याने त्याला एकटं एकटं वाटू लागलं होतं. त्याने आपल्या मनातील सल अनिरुद्ध नामक कथाकाराच्या प्रवचनात सांगितली. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याचवेळी गोरखपूरमध्ये राहणाऱ्या खुशीने आपल्या प्रियकरासोबत मोठा कट रचला. इंद्रची जमीन हडप करण्यासाठी खुशीने लग्न केलं आणि रचलेल्या कटानुसार इंद्र कुमारची हत्या केली. 

दरम्यान, कौशने जबलपूरमधील इंद्र कुमारीस संपर्क साधला आणि स्वत: संदीप आणि साहिबा बानो अशी ओळख सांगितली. त्याने सांगितलं त्याला त्याच्या बहिणीचा विवाह इंद्रशी लावून द्यायचा होता. या प्रस्तावावर इंद्र तिवारी खूश झाला आणि काही दिवसांत इंद्र हा साहिबा उर्फ खुशी तिवारीशी फोनवर बोलू लागला. हळूहळू ओळख वाढू लागल्याने एकमेकांचा विश्वास वाढू लागला. 3 जून रोजी संदीपने इंद्रला गोरखपूर येथे आणलं आणि इंद्र दोघांसोबत राहू लागला. 

एका बाजूला इंद्र विवाहाचं स्वप्न पाहत होता. तर दुसरीकडे खुशी आणि कौशलने कट रचण्याचा प्लॅन आखला. खुशीनं इंद्रशी लग्न करण्यापूर्वी एक प्रतिज्ञापत्र तयार केलं होतं, त्यात लिहिलं होतं की, इंद्रच्या मृत्यूनंतर, खुशी आणि संदीप हे इंद्रच्या मृत्यूनंतर जमिनीचे मालक असतील. इंद्रने आत्मविश्वासाने त्यावर स्वाक्षरी केली. 

दरम्यान, 5 जून रोजी गोरखपुरजवळील कुशीनगरात कास्य परिसरात एक हॉटेल बुक करण्यात आलं. इंद्र कुमार तिवारी आणि खुशी तिवारी यांचा विवाह झाला. इंद्रने पत्नीच्या भांगेत सिंदूर लावलं, फोटो, व्हिडिओ शूट करण्यात आले. इंद्रला या नात्याचा पूर्णपणे विश्वास होता. त्याचनंतर हनिमूनआधीच खुशीने जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर इंद्र बेशुद्ध पडला त्याला गाडीत टाकून एका निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याला संपवलं. 

हेही वाचा : धनशक्ती राजयोगामुळे 'या' राशींच्या लोकांचे खिसे कधीच राहणार नाहीत रिकामे

अखेर आरोपींना अटक

संबंधित प्रकरणाची माहिती कुशीनगर पोलिसांना मिळताच पोलीस सतर्क झाले. कुशीनगरमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख इंद्र कुमार अशी झाली. यावेळी पोलिसांनी मोबाईल लोकेशन, हॉटेल बुकिंग, वाहनाच्या एकूण माहितीच्या आधारे खुशी तिवारी, कौशल कुमार आणि चालक शमसुद्दीन अन्सारी यांना अटक केली. चौकशीदरम्यान तिघांनीही हत्येची कबुली दिली आणि कटाचा गौप्यस्फोट समोर आला. 

    follow whatsapp