Lok Sabha Election 2024: BJP चा मोठा निर्णय, पूनम महाजनांचं तिकीट कापलं.. उज्ज्वल निकमांना उमेदवारी!

मुंबई तक

27 Apr 2024 (अपडेटेड: 27 Apr 2024, 06:35 PM)

Ujjwal Nikam: लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने उत्तर मध्य मुंबई या मतदारासंघासाठी पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केलं आहे.

उज्ज्वल निकम यांना भाजपने दिलं तिकीट, पूनम महाजनांचा पत्ता कट

उज्ज्वल निकम यांना भाजपने दिलं तिकीट, पूनम महाजनांचा पत्ता कट

follow google news

Ujjwal Nikam BJP Candidate: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी भाजपने (BJP) उत्तर मध्य मुंबई (Mumbai North-Central) या मतदारासंघासाठी आज (27 एप्रिल) उमेदवाराची घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केलं आहे. याचाच अर्थ भाजपने येथील विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचं तिकीट कापलं आहे.  (lok sabha election 2024 bjp took big decision famous lawyer ujjwal nikam will be the bjp candidate from mumbai north central seat poonam mahajan ticket canceled)

हे वाचलं का?

भाजपचं 'मिशन 400' वर लक्ष केंद्रित केलं आहे.. त्यामुळेच आपला प्रत्येक उमेदवार हा अत्यंत पारखून देण्यावर भाजपचा भर आहे. त्यामुळेच तब्बल दोन वेळा खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी या मुबंई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरविण्यात आलं आहे.

यामुळे आता मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी थेट लढत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर केलं होतं. त्यामुळे तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात भाजप होतं. अखेर भाजपने पूनम महाजन यांना डावलत उज्ज्वल निकमांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

याआधी भाजपने याच जागेसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितशी संपर्क साधला होता अशीही चर्चा होती. दुसरीकडे भाजप आमदार आशिष शेलार यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण या सगळ्यांना मागे टाकत उज्ज्वल निकम यांनी बाजी मारली आहे.

हे ही वाचा>> ''मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली'', अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल करत टीका

वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले येथे राहणाऱ्या उच्चभ्रू-शिक्षित वर्गाला आकर्षित करू शकणाऱ्या प्रमुख व्यक्तीच्या शोधात भाजप होता. त्यामुळेच उज्ज्वल निकम यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर अखेर भाजपने शिक्कामोर्तब केलं आहे.

 

 

 

निकम यांची प्रतिष्ठा आणि स्वच्छ प्रतिमा हे निकष लक्षात घेऊन भाजपने दोन टर्म खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून निकमांना उमेदवारी देऊ केली.

हे ही वाचा>> काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र..?, खरगेंनी दिलं उत्तर

...म्हणून भाजपने उज्ज्वल निकमांना दिलं तिकीट?

26/11 च्या मुंबई हल्ला, 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, संजय दत्तविरुद्धचा खटला अशा अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांनी सरकारच्या वतीने कोर्टात बाजू मांडली होती. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. या सगळ्याचा भाजप निवडणुकीच्या दृष्टीने फायदा करून घेऊ शकतं.  

ऐतिहासिकदृष्ट्या, मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत पूनम महाजन यांनी या मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली होती. तर 2019 मध्येही त्यांनी येथून पुन्हा एकदा विजय मिळवला होता.

पूनम महाजन यांनी दोनदा मिळवलेला विजय

पूनम महाजन यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी 2006 मध्ये वडील प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिममधून पहिल्यांदाच त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा राम कदम यांनी पराभव केला होता. मात्र, 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केलेला. 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा जागेवर कोणत्याही पक्षाचे वर्चस्व नाही. कधी भाजप इथून जिंकली तर कधी काँग्रेस जिंकलीए. येथून शिवसेना आणि आरपीआयचे उमेदवारही विजयी झाले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन या जागेवरून विजयी झाल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचा पराभव केलेला. एकीकडे पूनम महाजन यांना 4,86,672 मते मिळाली होती, तर प्रिया दत्त यांना 3,56,667 मते मिळाली होती.

पूनम महाजन या एक एक प्रशिक्षित पायलट आहे. अमेरिकेतील टेक्सास येथून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना 300 तासांच्या उड्डाणाचा अनुभवही आहे. 2012 मध्ये ब्राइटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून बी.टेक पदवीही त्यांनी पूर्ण केली आहे.

मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघाचा इतिहास

1977 मध्ये माकपच्या अहिल्या रांगेकर यांनी या जागेवरुन विजय मिळवला होता. तर 1980 मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला मधू दंडवते यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केलेला. 1984 मध्ये काँग्रेसचे शरद दिघे येथून विजयी झाले होते. 1989 मध्ये शिवसेनेचे विद्याधर गोखले यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अत्यंत कमी फरकाने पराभव केला होता. पण 1991 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे शरद दिघे हे विजयी झाले होते. 1996 मध्ये शिवसेनेचे नारायण आठवले हे विजयी झालेले. 1998 मध्ये आरपीआयचे रामदास आठवले यांनी इथून विजय मिळवला होता. 1999 मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि त्यानंतर 2004 मध्ये एकनाथ गायकवाड, 2009 मध्ये सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त या काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. प्रिया दत्त यांनी भाजपच्या महेश राम जेठमलानी यांचा पराभव केलेला.

    follow whatsapp