सोलापूर: नियंत्रण सुटलं आणि तीन जणांनी गमावला जीव, स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात

विजयकुमार बाबर, सोलापूर: विजापूर-सोलापूर महामार्गावरा औरादजवळ एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. स्कॉर्पिओ कार झाडाला धडकल्याने हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. सोलापूरमधील तेरा मैलजवळील वकील वस्ती रस्तावर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:05 AM • 16 Jan 2022

follow google news

विजयकुमार बाबर, सोलापूर: विजापूर-सोलापूर महामार्गावरा औरादजवळ एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. स्कॉर्पिओ कार झाडाला धडकल्याने हा अपघात झाला असल्याचं समजतं आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

हे वाचलं का?

सोलापूरमधील तेरा मैलजवळील वकील वस्ती रस्तावर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये तीन जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. औराद ते सोलापूर या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने समोरच्या झाडाला जोरदार धडक दिली आहे.

तेरा मैल येथील लिंबाच्या झाडाला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने ही घटना घडली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर अन्य गंभीर जखमी तीन जणांना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार 15 ते 17 जण जखमी

या अपघातात किशोर अण्णाराव भोसले , नितीन भगवान भांगे आणि व्यंकटेश राम म्हेत्रे अशी मयत झालेले व्यक्तीची नावे आहेत.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं अन्.. भीषण अपघातात कारचा चक्काचूर

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोलापूरमध्ये एक भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये देखील अशाच पद्धतीने 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता.

सोलापूर-विजयपूर रोडवर झालेल्या एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना या कारचा भीषण अपघात झाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला होता.

नेमका अपघात कसा झाला?

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजयपूरहून सोलापूरकडे येत असताना कवठे गावाजवळील ब्रिजला कारने जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पाहटेच्या सुमारास भरधाव चालणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

अपघातातील मृतांची

या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या अपघातातील मृतांची नावं.

  1. अरुण कुमारलक्ष्मण एनकंची (वय 21 वर्ष)

  2. महबूब महम्मदअली मुल्ला (वय 18 वर्ष)

  3. फिरोज सैपनसाब शेख (वय 20 वर्ष)

  4. मुन्ना केंभावे (वय 21 वर्ष)

कार अपघातातील हे चारही मृत विजापूरमधील यरगल केंडी या गावचे रहिवासी होते.

    follow whatsapp