मुंबईतील 62 Vaccination Centres वर लसी संपल्याने लसीकरण थांबवण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राला लसींचा तुटवडा भासतो आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या रोज साडेतीन लाख लसी देण्यात येत आहेत. मात्र राज्यात सात लाख लसी रोज देण्याची राज्याची तयारी आहे. संपूर्ण राज्यभरात सुमारे 4 हजार केंद्र आहेत. ज्यापैकी अनेक सेंटर्सपर्यंत लसी न पोहचल्याने लसीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे. मुंबईत 132 लसीकरण केंद्र आहेत त्यापैकी आता 62 ठिकाणी लसींचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे लसीकरण थांबवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
कुठे कुठे उपलब्ध नाहीत लसी?
बॉम्बे हॉस्पिटल
नेव्ही फॅमिली सेंटर
HCG ICS कॅन्सर सेंटर
जसलोक हॉस्पिटल
सैफी हॉस्पिटल
HN रिलायन्स हॉस्पिटल
ब्रीच कँडी हॉस्पिटल
बीडी पारसी हॉस्पिटल
जैन हॉस्पिटल
भाटिया हॉस्पिटल
सेंट एलिझाबेथ हॉस्पिटल
व्होकार्ट हॉस्पिटल
मसीना हॉस्पिटल
ग्लोबल हॉस्पिटल
के जे. सोमय्या हॉस्पिटल
हिंदुजा हॉस्पिटल
रहेजा हॉस्पिटल
गुरूनानक हॉस्पिटल
एशियन हार्ट हॉस्पिटल
होली फॅमिली हॉस्पिटल
सूर्या हॉस्पिटल
लीलावती हॉस्पिटल
पीडी हिंदुजा हॉस्पिटल
महावीर हॉस्पिटल
होली स्पिरिट हॉस्पिटल
कोकिलाबेन हॉस्पिटल
नानावटी हॉस्पिटल
मल्लिका हॉस्पिटल
आरोग्य निधी हॉस्पिटल
मिल्लत डायलिसीस सेंटर
BSES MG हॉस्पिटल
लाईफलाईन हॉस्पिटल
श्री साई पार्वती क्लिनिक
श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
रिध्दी विनायक क्रिटिकल केअर सेंटर
या सगळ्या मुख्य हॉस्पिटल्ससहीत मुंबईतल्या 62 रूग्णालयांमध्ये लसी संपल्या आहेत त्यामुळे मुंबईत लस तुटवडा भासतो आहे. महापालिकेच्या असोत किंवा खासगी रूग्णालयांमधील असोत लसीकरण केंद्रांवरच्या लसी संपल्या आहेत त्यामुळे पुढच्या लसी मिळेपर्यंत या ठिकाणी लसीकरण मोहीम स्थगित करावी लागते आहे.
केंद्र सरकारने वेळप्रसंगी कर्ज काढावं पण सर्वांचं लसीकरण करावं; नाना पटोले यांचं वक्तव्य
देशभरात लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होणार आहे. आता केंद्र सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार 1 मेपासून १८ वर्षे आणि त्यावरील वयाच्या सगळ्यांना लस दिली जाणार आहे. मात्र महाराष्ट्राला लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतो आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसी या महाराष्ट्राला कमी पडत आहेत. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत दिली आहे. तसंच राजेश टोपे यांनी तर प्रसंगी आपण केंद्राचे पाय धरायला तयार आहोत पण आम्हाला ऑक्सिजन आणि लसी पुरवा असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT