अमोल मिटकरींचं सत्तारांबद्दल ट्विट, अजित पवारांच्या भूमिकेवरच शंका?

मुंबई तक

29 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:31 AM)

वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप आणि सिल्लोडमध्ये होत असलेला कृषी महोत्सव या दोन प्रकरणावरून अब्दुल सत्तारांची विरोधकांनी कोंडी केली. अब्दुल सत्तारांची ही दोन प्रकरणं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरत अजित पवारांनी थेट अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि जोपर्यंत राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आवाज उठवू असा इशाराही दिला. पण, […]

Mumbaitak
follow google news

वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप आणि सिल्लोडमध्ये होत असलेला कृषी महोत्सव या दोन प्रकरणावरून अब्दुल सत्तारांची विरोधकांनी कोंडी केली. अब्दुल सत्तारांची ही दोन प्रकरणं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात मांडली.

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरत अजित पवारांनी थेट अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि जोपर्यंत राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आवाज उठवू असा इशाराही दिला. पण, दुसरा दिवस उजाडला अन् सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी क्षीण झाली. आता याच मुद्द्यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी एक ट्विट केलं… ज्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एनआयटी भुखंड घोटाळा प्रकरणानंतर विरोधकांच्या हाती अब्दुल सत्तारांचा गायरान जमीन वाटप प्रकरण लागलं. अब्दुल सत्तार राज्य महसुल मंत्री असतानाच्या काळातील हे प्रकरण. त्यात भर टाकली सिल्लोड सांस्कृतिक महोत्सवानं. अब्दुल सत्तारांनी कृषी महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना टार्गेट दिल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात सांगितलं.

लवासा : “शरद पवारांसह कुटुंबियांविरुद्ध सीबीआय चौकशीचे आदेश द्या”

अब्दुल सत्तारांची दोन्ही प्रकरणं मांडत अजित पवारांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही जुनी उदाहरणं देत अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असेपर्यंत सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी भूमिका मांडली.

विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर आक्रमक पवित्रा घेतला, मात्र दुसऱ्याच दिवशी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीतील जोर कमी झाला. अमोल मिटकरींनी याच मुद्द्यांकडे विरोधकांचं लक्ष वेधत चिमटा काढलाय.

अमोल मिटकरींनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

अमोल मिटकरींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि इतरांनी जो अवैध भुखंड वाटला, त्याचप्रमाणे कृषी महोत्सवाच्या नावाखाली जी वसुली कृषीमंत्र्यांकडून झाली; त्याविरुद्ध राजीनाम्यची मागणी कालपासून तीव्र होणं अपेक्षित होतं. सभागृहात कृषीमंत्री बसलेले असताना त्यांचा राजीनामा कुणीच का नाही मागितला?”, असा सवाल अमोल मिटकरींनी केलाय.

शरद पवार मोदी-शाहंना भेटणार! अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर कोणत्या विषयावर खलबत?

कालच्या कामकाजात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सभागृहात उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडून सत्तारांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करण्यात न आल्यानंच अमोल मिटकरींनी स्वःपक्षीयांसह मित्र पक्षातील नेत्यांची कोंडी केलीये. असं असलं, तरी अजित पवारांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची पहिली मागणी सभागृहात अजित पवारांनी केली होती, त्यामुळे मिटकरींच्या ट्विटने अजित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा सुरू झालीये.

    follow whatsapp