शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ असं का म्हणाले?

मुंबई तक

• 10:11 AM • 27 Aug 2022

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली होती. यावर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची जरी प्रतिक्रिया आली नसली तरी उपमुख्यमंत्र्यांनी या युतीवर बोलताना टोला लगावला […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली होती. यावर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची जरी प्रतिक्रिया आली नसली तरी उपमुख्यमंत्र्यांनी या युतीवर बोलताना टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

‘विनाश काले विपरीत बुद्धी’ : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर माध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान जेव्हा पत्रकारांनी त्यांना शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. या प्रश्नावर त्यांनी फक्त ‘विनाश काले विपरीत बुद्धी’, अशी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला. आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीचा काय फायदा होणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र या युतीमुळे शिंदे गट आणि भाजपला काय नुकसान होणार, हेही पाहणं गरजेचं असणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही युतीवरून केली होती टीका

संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने युतीची घोषणा केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी खोचक सवाल केला. ही युती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी एक ट्विट केले. माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतलं असणार, कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करीत नाहीत, अशी थेट टीकाही त्यांनी केली.

संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले?

‘शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड दोन्ही लढवय्या संघटना आहेत. आज महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता चिरडवून टाकणं, प्रादेशिक पक्ष संपवणं यालाच लोकशाही मानणारे काही लोक बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत’, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

‘शिवसेना-संभाजी ब्रिगेड सर्व निवडणुका एकत्र लढवेल’

“महाराष्ट्राचं हित साधण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीचा निर्णय घेतला आहे. देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण झाली आहे. संविधान धोक्यात आलं आहे. त्याला सुरक्षित करायचं असेल, संरक्षण द्यायचं असेल, तर पुरोगामी संघटनांनी एकत्र यायला हवं. भविष्य काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सर्व निवडणुकात शिवसेनेसोबत असू”, असं संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे म्हणाले.

    follow whatsapp