बैल धुण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू तर दोघे बेपत्ता

धनंजय साबळे, अकोला पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या अकोल्यातील (Akola) आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना आज दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्ये ही दोन जण बैल धुण्यासाठी गेलेले असताना तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गावातील तलावात बुडाल्यानंतर त्याला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:48 PM • 06 Sep 2021

follow google news

धनंजय साबळे, अकोला

हे वाचलं का?

पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत गेलेल्या अकोल्यातील (Akola) आगर येथील युवकाचा गाव तलावात पडून वाहून गेल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना आज दुपारी घडली. तर काटेपूर्णा नदीमध्ये ही दोन जण बैल धुण्यासाठी गेलेले असताना तेही नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, आगर येथील मनोज खाडे हा युवक गावातील तलावात बुडाल्यानंतर त्याला नागरिकांनी बाहेर काढलं. मात्र, इतर दोघांचा अजूनही तपास सुरूच आहे. सागर गोपाळ कावरे आणि गोपाळ महादेब कांबे अशी दोघांची नावं आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

सर्वत्र पोळा उत्सव साजरा होत असताना या दिवशी बैलांची पूजा करण्याची प्रथा आहे. बैल धुण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे जवळच्या नदीवर नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते. नदीवर बैलांना धुतल्यानंतर त्यांना घरी आणून त्याची पूजा केली जाते. मात्र, आज बैल नदीवर घेऊन गेलेले तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दरम्यान, याआधी देखील नदीला पाणी जास्त असल्याने काही युवक किंवा नागरिक हे नदीच्या पात्रामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या असल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात.

अकोला तालुका आणि बार्शी-टाकळी तालुक्यातील असे तीन जण नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. आगर येथील मनोज खाडे हा बैल धुण्यासाठी गावातील तलावात गेला होता. त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरून तो तलावात बुडाला. जेव्हा हा प्रकार ग्रामस्थांच्या जेव्हा लक्षात आला तेव्हा त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं. पण दुर्दैवाने तरुणाला वाचविण्यात त्यांना यश आलं नाही.

दुसरीकडे बार्शी-टाकळी तालुक्यातील कानशिवणी येथील दोन युवक पार्डी येथील काटेपूर्णा व पिंजर्डा नदीच्या संगमावर बैल धूत असताना काटेपूर्णा नदीत वाहून गेले. सागर गोपाळ कावरे आणि गोपाळ महादेब कांबे अशी दोघांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नागपूर : पाच युवकांचा नदीत बुडून मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली दुर्घटना

दरम्यान, याप्रकरणी पिंजर पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली असल्याने पोलीस या दोघांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. मात्र, अद्याप दोघेही सापडलेले नाहीत.