ADVERTISEMENT
श्रीकृष्ण जन्माच्या दिवशी प्रत्येक घरात नारळाच्या वड्या आवर्जून बनवल्या जातात.
चला जाणून घेऊयात नारळाच्या वड्या नेमक्या कशा बनवल्या जातात.
सगळ्यात आधी मध्यम आचेवर एका पॅनमध्ये साखर आणि पाणी टाकून पाक बनवून घ्या.
नारळाच्या वड्या बनविण्यासाठी आपल्याला तीन तारी पाक बनवणं आवश्यक आहे.
पाक तयार झाला आहे की नाही. तुम्हाला बोटाने तपासून पाहावं लागेल. त्यासाठी थोडासा पाक थंड करु ते पाहा.
तीन तारी पाक तयार झालेला असेल तर गॅस बंद करा.
त्यानंतर खवणलेला नारळ हा तयार पाकामध्ये टाकून एकजीव करुन घ्या.
आता एका ताटाला तूप लावा आणि वरील मिश्रण त्यात टाका.
सजावटीसाठी त्यामध्ये काजू आणि बदाम टाका. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी थंड करत ठेवा.
ADVERTISEMENT











