राज्यात गेल्या 24 तासात दगावले तब्बल 594 कोरोना रुग्ण

मुंबई तक

• 04:47 PM • 19 May 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 34,031 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून तो 1 जूनपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र असं असलं तरी राज्यात कोरोनामुळे 594 जणांचा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 34,031 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून तो 1 जूनपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र असं असलं तरी राज्यात कोरोनामुळे 594 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज मृतांचा आकडा (Deaths) कमी झालेला असला तरीही हा आकडा प्रशासनासाठी दिलासादायक नक्कीच नाही. पण सध्या एक चांगली बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. त्यामुळे राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी झाला असून सध्याच्या घडीला राज्यात 4 लाख 01 हजार 695 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. इतर आस्थापने देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, असं असून देखील रुग्णांचा आकडा हा अजून योग्य प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण दुसरीकडे मृतांचा आकडा म्हणावा त्या प्रमाणात कमी होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी कायम आहे.

गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!

राज्यात आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 49,78,937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.06 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 594 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.54 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,18,74,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,67,537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 30,59,095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 23,828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 4,01,695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृतदेहांमधून कोरोना पसरू शकतो, कसे केले जावेत अंत्यसंस्कार?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 29 हजार 445

  • ठाणे (Thane) – 28 हजार 383

  • पुणे (Pune) – 67 हजार 295

  • नागपूर (Nagpur) – 23 हजार 272

  • नाशिक (Nashik)- 18 हजार 432

  • अहमदनगर (Ahmednagar) – 20 हजार 351

  • अमरावती (Amravati) – 9 हजार 967

  • जळगाव (Jalgaon) – 9 हजार 402

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 7 हजार 337

  • लातूर (Latur) – 5 हजार 982

  • नांदेड (Nanded)- 3 हजार 181

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 67 हजाराहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय नागपुरात देखील रुग्णांचा आकडा बराच जास्त आहे. ठाण्यामध्ये सध्या 28 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

मुंबईत दिवसभरात 1 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 1 हजार 350 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 57 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4 हजार 565 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 46 हजार 163 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 93 टक्के आहे. डबलिंग रेट 269 दिवसांवर गेला आहे.

    follow whatsapp