पंढरपूर : महाद्वार काल्याने कार्तिक वारीची सांगता

मुंबई तक

• 04:16 PM • 20 Nov 2021

पंढरपुरातल्या कार्तिकी वारीची आज काल्याने सांगता झाली आहे. गुलाल आणि बुक्क्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला उत्साहात साजरा करण्यात आला. या काल्यानंतर कार्तिकी यात्रेची सांगता झाली असं मानलं जातं. चारशे वर्षाहून अधिक व काळापासून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत नामदेव महाराज यांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज यांच्या वतीने […]

Mumbaitak
follow google news

पंढरपुरातल्या कार्तिकी वारीची आज काल्याने सांगता झाली आहे. गुलाल आणि बुक्क्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला उत्साहात साजरा करण्यात आला. या काल्यानंतर कार्तिकी यात्रेची सांगता झाली असं मानलं जातं.

हे वाचलं का?

चारशे वर्षाहून अधिक व काळापासून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत नामदेव महाराज यांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज यांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. अख्यायिके नुसार प्रत्यक्ष  विठ्ठलाने संत पांडुरंग महाराज यांना आपल्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या असे मानले जाते. तेव्हापासून महाद्वार काल्याची परंपरा सुरू आहे.

मागील तीन यात्रेमध्ये मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला पार पडला होता. परंतु यंदा वारीचे निर्बंध हटवल्या मुळे हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावली. परंपरेनुसार काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास त्यांच्या मस्तकावर विठ्ठलाच्या पादुका ठेवून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर महाद्वार घाटावरून चंद्रभागा वाळवंट, माहेश्वरी धर्मशाळा,  हरिदास वेस या मार्गाने पादुकाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी गुलाल, बुक्का व फुलांची उधळण करीत दर्शन घेतले. दरम्यान महाद्वार खाल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाल्याचे मानले जाते.

    follow whatsapp